पुणे : कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. केंद्राने सुद्धा खबरदारी घेण्यास सांगितले होते. केरळनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. काही लोक रस्त्यावर येऊन राजकारण करत आहेत. नियम पाळले पाहिजेत, अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल. त्यामुळे पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दरडावून सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.