AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंधुदुर्गात गवारेड्यांचा धुमाकुळ, हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकाचं मोठं नुकसान

कणकवली तालुक्यातील हळवल गावात गवारेड्यांनी धुमाकूळ घातला आहे. या रेड्यांनी शेतीचे घुसून प्रचंड नुकसान केले आहे. जवळपास अर्ध्या शेतातील उभं पिक या रेड्यांनी खाऊन टाकलं.

सिंधुदुर्गात गवारेड्यांचा धुमाकुळ, हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकाचं मोठं नुकसान
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 04, 2021 | 5:21 PM
Share

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील हळवल गावात गवा रेड्यांनी धुमाकूळ घातला आहे. या रेड्यांनी शेतीचे घुसून प्रचंड नुकसान केले आहे. जवळपास अर्ध्या शेतातील उभं पिक या रेड्यांनी खाऊन टाकलं. तसेच उरलेल्या शेतात नाचून शेतीचं नुकसान केलं आहे. त्यामुळे पीडित शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. आधीच आस्मानी आणि सुल्तानी संकटाने घेरलेल्या बळीराजा यामुळे मोठ्या अडचणीत सापडलाय.

गेल्या 4 वर्षांपासून गवारेड्यांनी शेतीचं नुकसान, उपाययोजना नाहीच

तौक्ते वादळ आणि त्यानंतर निर्माण झालेली पूरस्थितीमुळे चिंताग्रस्त असलेल्या बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. याबाबत वनविभागाने पाहणी करत पंचनामे केले आहेत. गेली 4 वर्षे हळवल गावात गवारेड्यांनी शेतीचे नुकसान करण्याचे सत्र सुरूच आहे.

गवारेड्यांच्या आगमनामुळे शेतकरी चिंतातूर

तौक्ते वादळ आणि पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. असं असतानाच या गवारेड्यांच्या आगमनामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. हळवल परबवाडी येथील शेतीचे गवारेडयांनी प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. परबवाडी येथील या शेतकऱ्याचे सुमारे अडीच एकर भागातील शेतीचे नुकसान झाले आहे.

गवारेड्याचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी

याबाबत वनरक्षक पल्लवी दाभाडे व हळवल पोलीस पाटील प्रकाश गुरव यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे तयार केले आहेत. गेली 4 वर्षे हे नुकसानीचे सत्र असेच सुरू आहे. शासनामार्फत मिळणारी नुकसान भरपाई ही तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतीचे होणारे नुकसान आणि मिळणारी भरपाई यात बरीच तफावत आहे. यामुळे या गवारेड्याचा कायम स्वरूपी बंदोबस्त व्हावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हेही वाचा :

औरंगाबादमध्ये शेतात विजेची तार कोसळली, शेतकऱ्याच्या 7-8 गाईंचा हकनाक मृत्यू

शिवनेरीच्या साक्षीनं, जुन्नरच्या निमगिरीत स्वंयचलित हवामान केंद्राची उभारणी,शेतकऱ्यांना एका क्लिकवर अचूक माहिती मिळणार

लातूरमध्ये सोयाबीनला उच्चांकी भाव, क्विंटलला 9600 रुपयांचा दर, दरवाढीचा फायदा नेमका कुणाला?

व्हिडीओ पाहा :

Forest Animal Gava Reda destroy farm in Sindhudurg

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.