AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gulabrao Gawande : सेनेचे माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना 2 वर्षांची शिक्षा, वाहन थांबवणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालणे भोवले!

माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना कलम 353 अन्वये दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजार रुपये दंड व कलम 294 अन्वये 2000 रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील इतर आरोपी असलेल्या तिघांना पुराव्याअभावी न्यायालयाने सुटका केली आहे.

Gulabrao Gawande : सेनेचे माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना 2 वर्षांची शिक्षा, वाहन थांबवणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालणे भोवले!
गुलाबराव गावंडे यांना 2 वर्षांची शिक्षा
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 03, 2022 | 3:33 PM
Share

अकोला : सेनेचे माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड सुनावला आहे. अकोला येथील अग्रसेन चौकात (Agrasen Chowk) तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घातला होता. शासकीय कामात अडथळा (Obstruction of Government Work) आणल्याप्रकरणात गावंडे यांनी शिक्षा ठोठावण्यात आली. गुलाबराव गावंडे हे सध्या सेनेत नाहीत. ते आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत. अकोला शहरातील अग्रसेन चौकात वाहतूक पोलीस कर्तव्यावर होते. वाहतूक पोलिस कर्मचारी संतोष गिरी (Santosh Giri) यांनी गावंडे यांचे वाहन थांबविले. ही घटना 16 डिसेंबर 1999 रोजी घडली. गुलाबराव गावंडे यांनी वाहन थांबवल्याच्या कारणावरून पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. तसेच शिविगाळ केल्याची घटना घडली होती.

चौघांविरोधात गुन्हा

याप्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष गिरी यांच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी सेनेचे चौघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये तत्कालीन क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राजू मधुकर मेतकर, गजानन नामदेव बचे, हरिनारायण रामराव गावंडे यांचा समावेश होता. या प्रकरणातील सुनावणीनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. डी. गव्हाणे यांनी सबळ पुरावे आणि साक्षीदार तपासले.

तिघांची पुराव्याअभावी सुटका

माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना कलम 353 अन्वये दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजार रुपये दंड व कलम 294 अन्वये 2000 रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील इतर आरोपी असलेल्या तिघांना पुराव्याअभावी न्यायालयाने सुटका केली आहे. सरकारतर्फे अॅड. दीपक गोटे यांनी काम पाहिले. त्यांना सीएमएस सेलचे राम पांडे व पोलीस ठाण्याचे बळीराम चतारे यांनी सहकार्य केले आहे.

काय होतं प्रकरण

गुलाबराव गावंडे हे मंत्री होते. वाहतूक पोलिसानं त्यांची गाडी अडविली. त्यामुळं ते संतप्त झाले. मी मंत्री आहे. माझी गाडी कशी काय थांबविली. यावरून हा वाद झाला. वाहतूक पोलीसही इरेस पोहचला. त्यानं मंत्र्याविरोधात तक्रार करण्याची हिंमत दाखविली. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. न्यायालयानं पुरावे तपासले. शेवटी गुलाबराव गावंडे दोषी ठरले. त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

Follow Us
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंचं भाषण...
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा