“सोमय्यांनी नोटीस घेतलं नाही अन्यथा आजच निकाल झाला असता” हसन मुश्रीफ यांच्याकडून कायदेशीर लढाई सुरु

| Updated on: Sep 28, 2021 | 5:38 PM

किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोल्हापूर सत्र न्यायालयात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा हसन मुश्रीफ यांनी दाखल केला आहे. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून हा यशस्वी होणार नाही, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

सोमय्यांनी नोटीस घेतलं नाही अन्यथा आजच निकाल झाला असता हसन मुश्रीफ यांच्याकडून कायदेशीर लढाई सुरु
किरीट सोमय्या हसन मुश्रीफ
Follow us on

कोल्हापूर: किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोल्हापूर सत्र न्यायालयात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा हसन मुश्रीफ यांनी दाखल केला आहे. कारखान्यांबद्दल त्यांनी जे आरोप केले होते ते आरोप गेल्या आठ दहा वर्षांच्या काळातील होते. माझ्या मंत्रिपदाच्या काळातील प्रकरण काढण्याचं आव्हान दिलं होतं. किरीट सोमय्यांनी त्यानंतर ग्राम विकास विभागासंदर्भात आरोप केला. ग्राम विकास विभागानं 10 जानेवारी 2021 ला आपण जाहिरात प्रसिद्ध केली. ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्या लेखा परिक्षणात सूत्रता असावी यासाठी आपण ही व्यवस्था आणली होती. ही व्यवस्था ऐच्छिक होती. 10 मार्च 2021 ला ऑर्डर दिल्यानंतर या कंपनीला एकही पैसा दिलेला नाही, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून हा यशस्वी होणार नाही, असं हसन मुश्रीफ म्हणाले. किरीट सोमय्यांनी नोटीस घेतलं नाही, अन्यथा कोर्टानं वनसाईड निकाल आजचं दिला असता, असं मुश्रीफ म्हणाले.

किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा

अ‌ॅड. प्रशांत चिटणीस यांनी आम्हीच पुरवलेली कागदपत्रे घेऊन आमच्या बदनामीचा प्रयत्न झाला म्हणून मुस्लीम समाज आणि हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांच्या वतीने अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. दाव्याचा कोर्ट समन्स आज किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनीही वेगवेगळी कारण दे समन्स घ्यायला नकार दिला, असं चिटणीस म्हणाले. सोमय्यांनी नोटीस स्वीकारली नसल्यानं अवमान याचिका दाखल करणार असल्याचं टिटणीस यांनी सांगितलं. सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांनी समन्स घ्यायला दिलेल्या नकाराची माहिती न्यायालयाला दिली आहे. लवकरच न्यायालयाच्या अवमानाची याचिका देखील दाखल करणार असल्याचं चिटणीस यांनी सांगितलं.

चारित्र्यहानन थांबवावं

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट समोय्या यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा कोल्हापूर दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. आम्हीच पुरविलेले कागद पत्रे घेवुन आमच्यावर खोटे नाटे आरोप बंद करावे अस देखील दाव्यात नमूद करण्यात आलं आहे. बदनामी करण्याच्या उल्लेखाने आरोप थांबवावेत, चारित्र्यहानन थांबवावे असं दाव्यात म्हटलं आहे. सहावे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांच्या कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला आहे.

किरीट सोमय्या काय म्हणाले?

आज हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा समोर आणत आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. हसन मुश्रीफ आणि जावई यांचा हा घोटाळा आहे. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या ग्रामविकास खात्याचं टेंडर स्वत:च्या जावयाच्या कंपनीला कंत्राट दिलं, असा आरोप सोमय्यांनी केला. हा घोटाळा 1500 कोटी रुपयांचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. जी कंपनी अस्तित्वात नाही त्या कंपनीतून पैसे आले. ठाकरे सरकारच्या मंत्र्यामध्ये घोटाळा करण्याची कला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

इतर बातम्या:

अनिल परब तो झांकी है, उद्धव ठाकरे अभी बाकी है; नितेश राणेंच्या सूचक विधानाने खळबळ

नाराज कॅप्टन अमरिंदर सिंह भाजपच्या वाटेवर, दिल्लीत नड्डा, शहांना भेटण्याची शक्यता, पंजाब काँग्रेसला मोठा झटका लागणार?

Hasan Mushrif file defamation case against Kirit Somaiya for scam allegations