AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे भाजपवर टीकास्त्र; अशी केली जहरी टीका

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्यास त्यांना वेळ नाही. अवकाळी पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे भाजपवर टीकास्त्र; अशी केली जहरी टीका
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 26, 2023 | 2:24 PM
Share

नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षांतर्गत पक्ष संघटना बांधणीसाठी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत. नंदुरबार येथे आले असताना राहुल गांधींचे निलंबन ते अधिवेशनात शेतकऱ्यांना मदतीची न झालेली घोषणा अधिवेशनावर त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगले टोले लगावले. आठ ते दहा लाख लोकांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातून खासदार निवडून दिलेला असतो. मात्र तो खासदार सत्ताधारी पक्षाला नाकीनऊ आणत असेल आणि त्याची टीका जिव्हारी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याची टीका त्यांनी केली.

आश्वासना पलीकडे काही नाही

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्यास त्यांना वेळ नाही. अवकाळी पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झाले. मात्र सरकारमधील मंत्री अधिवेशनाचे नाव करून अधिवेशनात मदत जाहीर केली जाईल, अशा घोषणा राज्यभर करत फिरले. अधिवेशन संपले मात्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली नाही. पूर्ण अधिवेशन उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर टीका करण्यातच खर्ची घातल्याचं चित्र आहे. सरकार फक्त आणि फक्त आश्वासनाचा पलीकडे काही करत नसल्याची टीका पाटील यांनी केली.

लोकांना ओढून आणावं लागत नाही

शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे मालेगाव मध्ये सहभाग घेत आहेत. या मतदारसंघात त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा आहे. या सभेच्या माध्यमातून हा लोकांचा पाठिंबा नक्की व्यक्त होईल. लोकांना ओढून आणावं लागत नाही ते स्वतःहून येतात हे त्यांच्या सभेचे वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितलं.

माल लगाओ आणि माल कमाओ

राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी अवकाळीमध्ये शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीवरुन सरकारसह राज्यकर्त्यांवर विखारी टीका केली आहे. राज्यकर्ते हे निच, नालायक, हलकट आणि स्वार्थी असून नुसती बोलतात. त्यांना अजिबात शेतकऱ्यांची जाण नाही. माल लगाओ आणि माल कमाओ हा फक्त त्यांचा धंदा असल्याचे सांगत हे हलटक राज्यकर्ते पुन्हा सत्तेत येतील असं वाटत नाही, असं टीकास्त्र गोटे यांनी सोडलं. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. असे असताना शासनाकडून कवडीची मदत झाली नाही. ते सरकारवर चांगलेच बरसल्याचे पहावयास मिळाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेत राहुल गांधी यांना उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे महत्त्व वाढले. त्यांना मोदी पप्पू म्हणतात. मात्र स्वतः मोदी पप्पू आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठकीच्यावेळी अनिल गोटे यांनी भाजपवर टीका केली.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड