कोल्हापूर : एका समाजाला धरून टीका केली जात असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. याबाबत बोलताना भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणतात, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी असं विधान करावं. शरद पवार यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सांगावं की, हसन मुश्रीफ यांचं विधान मला मान्य आहे. उद्धव ठाकरे हे दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन फिरतात. त्यांनीसुद्धा असं विधान करावं, असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलं. पैसे चोरताना, घोटाळा करताना, ग्रामपंचायतींवर कर लावताना, इतरांच्या नावानं भ्रष्टाचाराचा पैसा पार्किंग करताना तुम्हाला धर्म आठवला नव्हता का, असा सवालही किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विचारला.