मुंबई : राज्य सरकारने कोरोना निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिलीय. यानंतर आता अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने याबाबत आदेश जारी केलेत. त्यामुळे मागील मोठ्या काळापासून निर्बंधांचा सामना करावा लागल्यानं आर्थिक डबघाईला आलेल्या व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. निर्बंध कमी झाल्यानं व्यावसायाची घडी पुन्हा बसेल अशी आशा सर्वांनाच लागली आहे.
राज्यातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर औरंगाबाद शहरातील मंगल कार्यालय व्यवसायाला पुन्हा एकदा चालना मिळणार आहे. निर्बंध शिथिल झाल्याच्या पहिल्याच दिवशी औरंगाबाद शहरातील मंगल कार्यालयात बुकिंग सुरू झाली आहे. त्यामुळे मंगल कार्यालय व्यावसायिक आनंदित झालेत.
कोरोनाचे शिथिल होत असलेले निर्बंध आणि लागून आलेल्या सुट्ट्या यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात भाविकांची गर्दी बघायला मिळते आहे. तब्बल दीड वर्षांपासून निर्मनुष्य असलेला रामकुंड परिसर भाविकांमुळे पुन्हा एकदा भरून गेला आहे. मात्र, येणाऱ्या भाविकांनी आणि इथे काम करणाऱ्या पुरोहितांनी देखील मास्क आणि सॅनिटायझरबाबत जागरूक राहावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
Know new restriction rules of Ahmednagar Satara and other district of Maharashtra