AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास, रोज नदी पार करणं धोकादायक!

शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण हे या बोर्डी नदीमुळे खडतर असल्याचे दिसून येते. या बॉर्डर नदीला जास्त पाणी राहिले तर या विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.

चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास, रोज नदी पार करणं धोकादायक!
चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवासImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Sep 16, 2022 | 7:37 PM
Share

अकोला : जिल्ह्यातल्या अकोट (Akot) तालुक्यामधील वडाळी देशमुख (Wadali Deshmukh) हे गाव राजकीय दृष्ट्या बहुचर्चित आहे. पण, वडाळी देशमुख विकासाच्या दृष्टीने मात्र जैसे थेच आहे. या गावात कुठलीही सुधारणा नसल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजीनगर (Shivajinagar) हे छोटसं गाव बोर्डी नदीच्या तिरावर वसलेलं आहे. संपूर्ण मजूर वर्गाचा संपर्क गावापासून तुटलेला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या वस्तीमधील नागरिकांची कुठल्याचं प्रकारची सोयी-सुविधा उपलब्ध नाही. त्यांना आज रोजी दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी नेहमीच नदी पार करावी लागते. शालेय विद्यार्थ्यांना वाहत्या प्रवाहातून मार्ग काढावा लागतो.

गुडघाभर पाण्यातून प्रवास

चिमुकले विद्यार्थी हे गावांमध्ये शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात टाकतात. पाण्याच्या प्रवाहातून शाळेत जाण्यासाठी रोज प्रवास करतात. दररोज सकाळी शाळेमध्ये जाण्यासाठी शिवाजीनगर येथील विद्यार्थी हे बोर्डी या ठिकाणी येतात. त्यासाठी त्यांना दररोज बोर्ड नदीच्या गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागतो.

अशी आहे गावकऱ्यांची तक्रार

ही अत्यंत दयनीय बाब आहे. यावर आजपर्यंत कुठल्याच स्थानिक राजकारणी पुढाऱ्यांनी पुढाकार घेतला नाही. आमदार, जिल्हा परिषद, तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने माध्यमातून कुठल्याच प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला नाही. छोटे खाणी पूल त्या ठिकाणी आजपर्यंत बांधण्यात आलेला नाही. अशी गावकऱ्यांची तक्रार आहे.

गावकऱ्यांची मागणी काय

शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण हे या बोर्डी नदीमुळे खडतर असल्याचे दिसून येते. या बॉर्डर नदीला जास्त पाणी राहिले तर या विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे. लवकरात लवकर बोर्डी नदीवर पूल बांधण्यात यावा. अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. असं शिवाजीनगरचे रहिवासी प्रकाश काळे यांनी सांगितलं.

Follow Us
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण.
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'.
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस...
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस....
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार.
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध.