AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास, रोज नदी पार करणं धोकादायक!

शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण हे या बोर्डी नदीमुळे खडतर असल्याचे दिसून येते. या बॉर्डर नदीला जास्त पाणी राहिले तर या विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.

चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास, रोज नदी पार करणं धोकादायक!
चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवासImage Credit source: t v 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Sep 16, 2022 | 7:37 PM
Share

अकोला : जिल्ह्यातल्या अकोट (Akot) तालुक्यामधील वडाळी देशमुख (Wadali Deshmukh) हे गाव राजकीय दृष्ट्या बहुचर्चित आहे. पण, वडाळी देशमुख विकासाच्या दृष्टीने मात्र जैसे थेच आहे. या गावात कुठलीही सुधारणा नसल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजीनगर (Shivajinagar) हे छोटसं गाव बोर्डी नदीच्या तिरावर वसलेलं आहे. संपूर्ण मजूर वर्गाचा संपर्क गावापासून तुटलेला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या वस्तीमधील नागरिकांची कुठल्याचं प्रकारची सोयी-सुविधा उपलब्ध नाही. त्यांना आज रोजी दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी नेहमीच नदी पार करावी लागते. शालेय विद्यार्थ्यांना वाहत्या प्रवाहातून मार्ग काढावा लागतो.

गुडघाभर पाण्यातून प्रवास

चिमुकले विद्यार्थी हे गावांमध्ये शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात टाकतात. पाण्याच्या प्रवाहातून शाळेत जाण्यासाठी रोज प्रवास करतात. दररोज सकाळी शाळेमध्ये जाण्यासाठी शिवाजीनगर येथील विद्यार्थी हे बोर्डी या ठिकाणी येतात. त्यासाठी त्यांना दररोज बोर्ड नदीच्या गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागतो.

अशी आहे गावकऱ्यांची तक्रार

ही अत्यंत दयनीय बाब आहे. यावर आजपर्यंत कुठल्याच स्थानिक राजकारणी पुढाऱ्यांनी पुढाकार घेतला नाही. आमदार, जिल्हा परिषद, तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने माध्यमातून कुठल्याच प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला नाही. छोटे खाणी पूल त्या ठिकाणी आजपर्यंत बांधण्यात आलेला नाही. अशी गावकऱ्यांची तक्रार आहे.

गावकऱ्यांची मागणी काय

शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण हे या बोर्डी नदीमुळे खडतर असल्याचे दिसून येते. या बॉर्डर नदीला जास्त पाणी राहिले तर या विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे. लवकरात लवकर बोर्डी नदीवर पूल बांधण्यात यावा. अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. असं शिवाजीनगरचे रहिवासी प्रकाश काळे यांनी सांगितलं.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप