AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Tiger : शेतात जाणारा महेश वाघाच्या हल्ल्यात जखमी; असा वाचवला जीव

वाघाच्या तावडीतून सुटून तो झाडावर चढला. त्यानंतर काही वेळाने वाघ तिथून निघून गेला. त्यानंतर महेश झाडावरून खाली उतरला.

Chandrapur Tiger : शेतात जाणारा महेश वाघाच्या हल्ल्यात जखमी; असा वाचवला जीव
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Feb 23, 2023 | 10:36 AM
Share

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात जंगलालगत वाघाचे हल्ले हा काही नवीन विषय नाही. त्यामुळे शेतालगत शेती असलेले शेतकरी विचार करूनच शेतात जातात. शेतात जात असताना काळजी ही त्यांना घ्यावीच लागते. कारण कुठून वन्यप्राणी हल्ले करतील काही सांगता येत नाही. अशीच ही घटना मूल तालुक्यातील चितेगाव येथे घडली. वाघाने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला (Tiger Attack) केला. यात तो जखमी झाला. त्याच्या दोन्ही हातांना दुखापत (injured in a tiger attack) झाली. शिवाय पाठीवरही मार लागला. त्यानंतर शेतकऱ्याने कशीतरी वाघाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. लगेच शेजारी असेल्या झाडावर चढला. त्यामुळे या शेतकऱ्याचे प्राण वाचले.

अशी केली वाघाच्या तावडीतून सुटका

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चितेगाव येथील युवा शेतकरी गावाजवळच्याच आपल्या शेतात लाखोळी खोदायला जात होता. अचानक वाघाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. महेश नामदेव तोडासे असे जखमी झालेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. तो आपल्या शेतात जात असताना अचानक वाघाने हल्ला केला. वाघाच्या तावडीतून आपला जीव वाचवत महेश शेजारी असलेल्या झाडावर चढला. त्यानंतर वाघ काही वेळ तिथेच थांबला. मात्र काही कालावधीने वाघ निघून गेल्याने महेशचा जीव वाचला.

नेमकं काय घडलं?

महेश तोडासे हा शेतकरी शेतावर जात होता. त्याच्या शेतात लाखोळी आहे. लाखोळी खोदायला आली आहे. ती काढण्यासाठी तो आपल्या शेतावर जात होता. शेतात जात असताना अचानक वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या दोन्ही हातांना जखमा झाल्या. वाघाच्या तावडीतून सुटून तो झाडावर चढला. त्यानंतर काही वेळाने वाघ तिथून निघून गेला. त्यानंतर महेश झाडावरून खाली उतरला. मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात महेशला दाखल करण्यात आले.

कालच बिबट्या सापडला मृतावस्थेत

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळला. 4 वर्षे वयाचा नर बिबट मृतावस्थेत आढळल्यावर वनपथकाने बिबट मृत्यूची माहिती वरिष्ठांना दिली. वनाधिकारी व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पशुचिकित्सा अधिकाऱ्यांनी पाहणी करून सर्व अवयव शाबूत असल्याची ग्वाही दिली आहे. दुसऱ्या एखाद्या वन्यजीवाशी झुंजीत हा बिबट ठार झाला असल्याची शक्यता वर्तविली गेली आहे. पंचनामा आणि शव विच्छेदनानंतर मृत बिबट्याचे दहन करण्यात आले.

Follow Us
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर; लाखो शेतकऱ्यांना फायदा
जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं; जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर...
Devendra Fadnavis | जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं!; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर फडणवीसांचं मोठं विधान