AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

..म्हणून शरद पवारांना अजूनही दौरे करावे लागतात, गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

शरद पवार यांचे कितीही दौरे झाले, तरीदेखील काही फरक पडणार नाही.

..म्हणून शरद पवारांना अजूनही दौरे करावे लागतात, गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?Image Credit source: t v 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Sep 29, 2022 | 3:19 PM
Share

गणेश सोळंकी, Tv 9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा : आमदार गोपीचंद पडळकर आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मेंढपाळ बांधवांच्या मेळाव्याला ते उपस्थित होते. यावेळी पडळकर म्हणाले, पन्नास वर्षात राष्ट्रवादीला कधी तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केलं. राज्यात गेल्या 40-50 वर्षापासून राष्ट्रवादीला स्वबळावर तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाही. विश्वासघात न करता, कुणाच्या पाठीत खंजीर न खूपसता त्यांना कधी मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, अशी टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादीला आता दौरे करत बसावं लागतं. शरद पवार यांचे कितीही दौरे झाले, तरीदेखील काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी पक्ष नको असं म्हणणाऱ्या युवकांची फळी राज्यात निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारीपणाला यांच्या जातीवादीपणाला आणि यांच्या विश्वासघातीपणाला राज्यातील लोकांनी कायम नकार दिला आहे. पुढेही देतील, असंही आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. ते मेंढपाळ बांधवांच्या मेळाव्याला बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

छगन भुजबळ यांनी सरस्वती व शारदा मातीचे फोटोची शाळेमध्ये काय गरज, असे विधान केलं होतं. त्यानंतर त्यावरही पडळकर यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता कुठलंही काम राहिलेले नाही. त्यामुळं काहीतरी वाद उफाळण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे. त्याला राज्यातील जनता फार महत्त्व देत नाही असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीमागून देशात अनेक लोकं आली. ममता बॅनर्जी स्वतःच्या भरोशावर मुख्यमंत्री झाल्या. मायावतीही मुख्यमंत्री झाल्यात. जगनमोहनसारखा नवीन चेहरा समोर आला. अरविंद केजरीवाल यांनी एकहाती सत्ता आणली.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही कामं शिल्लक राहिले नाही. नवीन वाद उखरायचं काम सुरू आहे. भाजपचा मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा हे देशात भाजपचं नेतृत्व करतात.

Follow Us
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा