AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

..म्हणून शरद पवारांना अजूनही दौरे करावे लागतात, गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

शरद पवार यांचे कितीही दौरे झाले, तरीदेखील काही फरक पडणार नाही.

..म्हणून शरद पवारांना अजूनही दौरे करावे लागतात, गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?Image Credit source: t v 9
| Updated on: Sep 29, 2022 | 3:19 PM
Share

गणेश सोळंकी, Tv 9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा : आमदार गोपीचंद पडळकर आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मेंढपाळ बांधवांच्या मेळाव्याला ते उपस्थित होते. यावेळी पडळकर म्हणाले, पन्नास वर्षात राष्ट्रवादीला कधी तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केलं. राज्यात गेल्या 40-50 वर्षापासून राष्ट्रवादीला स्वबळावर तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाही. विश्वासघात न करता, कुणाच्या पाठीत खंजीर न खूपसता त्यांना कधी मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, अशी टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादीला आता दौरे करत बसावं लागतं. शरद पवार यांचे कितीही दौरे झाले, तरीदेखील काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी पक्ष नको असं म्हणणाऱ्या युवकांची फळी राज्यात निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारीपणाला यांच्या जातीवादीपणाला आणि यांच्या विश्वासघातीपणाला राज्यातील लोकांनी कायम नकार दिला आहे. पुढेही देतील, असंही आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. ते मेंढपाळ बांधवांच्या मेळाव्याला बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

छगन भुजबळ यांनी सरस्वती व शारदा मातीचे फोटोची शाळेमध्ये काय गरज, असे विधान केलं होतं. त्यानंतर त्यावरही पडळकर यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता कुठलंही काम राहिलेले नाही. त्यामुळं काहीतरी वाद उफाळण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे. त्याला राज्यातील जनता फार महत्त्व देत नाही असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीमागून देशात अनेक लोकं आली. ममता बॅनर्जी स्वतःच्या भरोशावर मुख्यमंत्री झाल्या. मायावतीही मुख्यमंत्री झाल्यात. जगनमोहनसारखा नवीन चेहरा समोर आला. अरविंद केजरीवाल यांनी एकहाती सत्ता आणली.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही कामं शिल्लक राहिले नाही. नवीन वाद उखरायचं काम सुरू आहे. भाजपचा मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा हे देशात भाजपचं नेतृत्व करतात.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.