AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे हजारो कैदी पॅरोलवर बाहेर, रोजगाराच्या प्रश्नामुळे पुन्हा तुरुंगात जाण्याची इच्छा

कोरोना साथीच्या आजारामुळे (CoronaVirus) तुरुंग प्रशासनाने गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रातील तुरूंगातील 10 हजारांहून अधिक कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे हजारो कैदी पॅरोलवर बाहेर, रोजगाराच्या प्रश्नामुळे पुन्हा तुरुंगात जाण्याची इच्छा
तळोजा कारागृहात कैद्यांचे प्रचंड हाल
| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 8:07 PM
Share

अमरावती : कोरोना साथीच्या आजारामुळे (CoronaVirus) तुरुंग प्रशासनाने गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रातील तुरूंगातील 10 हजारांहून अधिक कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कैदी पॅरोलवर त्यांच्या घरी पोहोचले, पण आता रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे कैदी पुन्हा तुरुंगात जाण्यास तयार झाले आहेत. (Prison administration releases thousands of prisoners on parole due to Corona, prisoners wants to go back to jail over employment issues)

2010 मध्ये अमरावतीच्या मंगरूळ चवाळा गावात वादाच्या वेळी विरोधी गटातील एका मृतदेह त्यांच्या शेतात सापडल्यानंतर अनंत चवाळे आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली होती. अनंत आणि त्याच्या भावाला 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2014 मध्ये त्याच्या भावाचा मृत्यू झाला. अनंत चवाळे 2013 पासून अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मे 2020 मध्ये त्याला पॅरोलवर घरी सोडण्यात आले.

अनंत, त्यांची पत्नी आणि 12 वर्षांचा मुलगा जो मानसिक आजाराने त्रस्त आहे, असे तिघे भाड्याच्या एका खोलीत राहतात. कोरोना साथीच्या आजारामुळे राज्य सरकारने कैद्यांना पॅरोलवर सोडले, पण त्यांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. पॅरोलवर सुटलेल्या कैद्याकडे समाजाचा दृष्टीकोन चांगला नाही. त्यांना रोजगार देण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे आता त्या कैद्यांना वाटते की त्यांच्यासाठी तुरूंग चांगला आहे.

अनंतची पत्नी आपल्या एका अपंग मुलासह भाड्याने घेतलेल्या एका खोलीत राहते, काही घरगुती कामे करुन तिला महिन्याला 2300 रुपये मिळतात. 2300 रुपयांमध्ये मुलाला आणि पतीला सांभाळणे तिच्यासाठी कठीण झाले आहे, त्यामुळे तिलाही असे वाटते की, नवरा तुरूंगात राहिला तर बरा.

पॅरोलवर असलेल्या कैद्यांना रोजगार द्यावा

गेल्या काही वर्षांपासून कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी काम करणारे वऱ्हाड संस्थेचे अध्यक्ष रवी वैद्य सध्या पॅरोलवर असलेल्या कैद्यांना आणि इतर गरजूंना दररोज विनामूल्य भोजन पुरवतात, परंतु जर सरकारने कैद्यांना पॅरोलवर सोडले मात्र त्यांना रोजगार नसल्याने त्यांच्यासमोर बिकट प्रसंग निर्माण झाला आहे. सरकारने त्यांना रोजगार किंवा काही पॅकेज द्यावे अशी मागणी वैद्य यांनी केली आहे.

इतर बातम्या

भर दुपारी दरोडेखोर बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घुसला, 50 लाखांच्या खंडणीची मागणी, नागपूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या महिला खेळाडूवर पोलीस अधिकाऱ्याचा बलात्कार, पंजाब पोलिसात मोठी खळबळ

(Prison administration releases thousands of prisoners on parole due to Corona, prisoners wants to go back to jail over employment issues)

Follow Us
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.