AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे हजारो कैदी पॅरोलवर बाहेर, रोजगाराच्या प्रश्नामुळे पुन्हा तुरुंगात जाण्याची इच्छा

कोरोना साथीच्या आजारामुळे (CoronaVirus) तुरुंग प्रशासनाने गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रातील तुरूंगातील 10 हजारांहून अधिक कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे हजारो कैदी पॅरोलवर बाहेर, रोजगाराच्या प्रश्नामुळे पुन्हा तुरुंगात जाण्याची इच्छा
तळोजा कारागृहात कैद्यांचे प्रचंड हाल
| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 8:07 PM
Share

अमरावती : कोरोना साथीच्या आजारामुळे (CoronaVirus) तुरुंग प्रशासनाने गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रातील तुरूंगातील 10 हजारांहून अधिक कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कैदी पॅरोलवर त्यांच्या घरी पोहोचले, पण आता रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे कैदी पुन्हा तुरुंगात जाण्यास तयार झाले आहेत. (Prison administration releases thousands of prisoners on parole due to Corona, prisoners wants to go back to jail over employment issues)

2010 मध्ये अमरावतीच्या मंगरूळ चवाळा गावात वादाच्या वेळी विरोधी गटातील एका मृतदेह त्यांच्या शेतात सापडल्यानंतर अनंत चवाळे आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली होती. अनंत आणि त्याच्या भावाला 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2014 मध्ये त्याच्या भावाचा मृत्यू झाला. अनंत चवाळे 2013 पासून अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मे 2020 मध्ये त्याला पॅरोलवर घरी सोडण्यात आले.

अनंत, त्यांची पत्नी आणि 12 वर्षांचा मुलगा जो मानसिक आजाराने त्रस्त आहे, असे तिघे भाड्याच्या एका खोलीत राहतात. कोरोना साथीच्या आजारामुळे राज्य सरकारने कैद्यांना पॅरोलवर सोडले, पण त्यांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. पॅरोलवर सुटलेल्या कैद्याकडे समाजाचा दृष्टीकोन चांगला नाही. त्यांना रोजगार देण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे आता त्या कैद्यांना वाटते की त्यांच्यासाठी तुरूंग चांगला आहे.

अनंतची पत्नी आपल्या एका अपंग मुलासह भाड्याने घेतलेल्या एका खोलीत राहते, काही घरगुती कामे करुन तिला महिन्याला 2300 रुपये मिळतात. 2300 रुपयांमध्ये मुलाला आणि पतीला सांभाळणे तिच्यासाठी कठीण झाले आहे, त्यामुळे तिलाही असे वाटते की, नवरा तुरूंगात राहिला तर बरा.

पॅरोलवर असलेल्या कैद्यांना रोजगार द्यावा

गेल्या काही वर्षांपासून कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी काम करणारे वऱ्हाड संस्थेचे अध्यक्ष रवी वैद्य सध्या पॅरोलवर असलेल्या कैद्यांना आणि इतर गरजूंना दररोज विनामूल्य भोजन पुरवतात, परंतु जर सरकारने कैद्यांना पॅरोलवर सोडले मात्र त्यांना रोजगार नसल्याने त्यांच्यासमोर बिकट प्रसंग निर्माण झाला आहे. सरकारने त्यांना रोजगार किंवा काही पॅकेज द्यावे अशी मागणी वैद्य यांनी केली आहे.

इतर बातम्या

भर दुपारी दरोडेखोर बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घुसला, 50 लाखांच्या खंडणीची मागणी, नागपूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या महिला खेळाडूवर पोलीस अधिकाऱ्याचा बलात्कार, पंजाब पोलिसात मोठी खळबळ

(Prison administration releases thousands of prisoners on parole due to Corona, prisoners wants to go back to jail over employment issues)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.