AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी दंगली घडवतं”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं दंगलींचं राजकारण सांगितलं

सध्या राज्यातील सामाजिक परिस्थिती योग्यरित्या हातळण्याची गरज असून यामध्ये होणारे राजकीय हस्तक्षेप टाळले गेले पाहिजेत असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी दंगली घडवतं; राष्ट्रवादीच्या नेत्यानं दंगलींचं राजकारण सांगितलं
| Updated on: Jun 13, 2023 | 4:23 PM
Share

सांगली : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काही कारणास्तव दंगली घडल्या आहेत. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात घडलेल्या घटनांवरून विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांवरच ठपका ठेवला आहे. त्यामुळे आता या दंगली राज्यकर्ते घडवत आहेत का असा सवाल आता नागरिकांसह राजकीय नेत्यांनीही सत्ताधाऱ्यांवर ठपका ठेवत आता गंभीर आरोपही केले आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे.

आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीका करताना राज्यात घडणाऱ्या दंगलीमुळे समाजातील सामाजिक सलोखा बिघडत चालत आहे. यामुळे सामाजिक परिस्थित गंभीर रुप धारण कर असून या सगळ्या गोष्टींना कारणीभूत सरकार असल्याचा गंभीर आरोपही जंयत पाटील यांनी केला आहे.

कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि राज्यातील इतर ठिकाणी दंगली घडत असताना त्यावर पोलिसांनी आणि प्रशासनाने नियंत्रण मिळवले असले तरी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सध्या वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी विरोधकांवर केला आहे.

ज्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे तिथे दंगली घडवल्या जात आहेत असा गंभीर आरोपही जयंत पाटील यानी केला आहे.

आज सांगलीत जयंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची भेट घेत कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याबाबत निवेदन सादर केले.

सध्या राज्यातील सामाजिक परिस्थिती योग्यरित्या हातळण्याची गरज असून यामध्ये होणारे राजकीय हस्तक्षेप टाळले गेले पाहिजेत असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.