AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी दंगली घडवतं”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं दंगलींचं राजकारण सांगितलं

सध्या राज्यातील सामाजिक परिस्थिती योग्यरित्या हातळण्याची गरज असून यामध्ये होणारे राजकीय हस्तक्षेप टाळले गेले पाहिजेत असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी दंगली घडवतं; राष्ट्रवादीच्या नेत्यानं दंगलींचं राजकारण सांगितलं
| Updated on: Jun 13, 2023 | 4:23 PM
Share

सांगली : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काही कारणास्तव दंगली घडल्या आहेत. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात घडलेल्या घटनांवरून विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांवरच ठपका ठेवला आहे. त्यामुळे आता या दंगली राज्यकर्ते घडवत आहेत का असा सवाल आता नागरिकांसह राजकीय नेत्यांनीही सत्ताधाऱ्यांवर ठपका ठेवत आता गंभीर आरोपही केले आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे.

आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीका करताना राज्यात घडणाऱ्या दंगलीमुळे समाजातील सामाजिक सलोखा बिघडत चालत आहे. यामुळे सामाजिक परिस्थित गंभीर रुप धारण कर असून या सगळ्या गोष्टींना कारणीभूत सरकार असल्याचा गंभीर आरोपही जंयत पाटील यांनी केला आहे.

कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि राज्यातील इतर ठिकाणी दंगली घडत असताना त्यावर पोलिसांनी आणि प्रशासनाने नियंत्रण मिळवले असले तरी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सध्या वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी विरोधकांवर केला आहे.

ज्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे तिथे दंगली घडवल्या जात आहेत असा गंभीर आरोपही जयंत पाटील यानी केला आहे.

आज सांगलीत जयंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची भेट घेत कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याबाबत निवेदन सादर केले.

सध्या राज्यातील सामाजिक परिस्थिती योग्यरित्या हातळण्याची गरज असून यामध्ये होणारे राजकीय हस्तक्षेप टाळले गेले पाहिजेत असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.