AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिलायन्स ज्वेल्स या सराफा पेढीवरील दरोडा, दरोड्यात काय काय गेलं, तपासाची दिशा काय?

आता काही दागिने ज्वेल्समध्येच सापडले. त्यामुळे फक्त सहा कोटींचाच दरोडा पडल्याची माहिती समोर आली.पोलीस दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी बिहार आणि दिल्लीच्या दिशेने तपास करत आहेत.

रिलायन्स ज्वेल्स या सराफा पेढीवरील दरोडा, दरोड्यात काय काय गेलं, तपासाची दिशा काय?
| Updated on: Jun 11, 2023 | 5:06 PM
Share

शंकर देवकुळे, प्रतिनिधी, सांगली : सांगलीत पडलेल्या दरोड्यात आधी १४ कोटींची संपत्ती दरोडेखोरांनी लुटल्याची तक्रार करण्यात आली होती. आता काही दागिने ज्वेल्समध्येच सापडले. त्यामुळे फक्त सहा कोटींचाच दरोडा पडल्याची माहिती समोर आली.पोलीस दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी बिहार आणि दिल्लीच्या दिशेने तपास करत आहेत. अद्याप ठोस पुरावे हाती आले नाहीत. सांगली शहरातील रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवरील दरोड्याचा तपास पोलीस करत आहेत. पथकाला मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीमुळे दिल्ली आणि बिहारमध्येच तपासावर लक्ष केंद्रित केले आहे. हैदराबादमधील काहींकडे केलेल्या चौकशीचाही यासाठी उपयोग झाला आहे.

रिलायन्सकडून पोलिसांना सुधारित पत्र

दरोड्यानंतर १४ कोटी ६९ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे फिर्यादीत म्हटले होते. मात्र, शनिवारी रिलायन्सच्यावतीने सुधारित पत्र पोलिसांना दिले. त्यात सहा कोटी ४४ लाख ३०० चा ऐवज लंपास झाल्याचे म्हटले आहे. रविवारी दुपारी दरोडा पडल्यानंतर १४ कोटींचा ऐवज लंपास झाल्याचे सांगण्यात आले होते.

हिरे, सोन्याचे दागिने पेटीतच

त्यानंतरच्या फिर्यादीत १४ कोटी ६९ लाख ३०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केल्याचे म्हणण्यात आले होते. मात्र, शनिवारी रिलायन्सच्या वतीने एक पत्र पोलिसांना देण्यात आले. त्यात हिरे आणि सोन्याचे दागिने असलेली पिशवी पेढीतच आढळून आली. सहा कोटी ४४ लाख ३०० रुपयांचाच माल चोरट्यानी लंपास केल्याचे पत्रात म्हटले आहे.

एलसीबीची पथके विविध ठिकाणी रवाना

वसंतदादा मार्केट यार्डाजवळील रिलायन्स ज्वेल्स या दुकानातून रविवारी भरदिवसा दरोडेखोरांनी १४ कोटी रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने लुटले होते. घटनेनंतर सुरू ठेवला आहे. एलसीबीसह पोलिसांची पथके विविध ठिकाणी तपासासाठी रवाना झाली आहेत.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि बिहार येथेच तपासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यातही बिहारमध्ये स्थानिक पोलिसांना सूचना देत तपास सुरु ठेवला आहे. हैदराबादमध्ये गेल्या दोन दिवसांपासून करण्यात आलेल्या तपासणीतूनही काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...