AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबराव पाटील यांचं सट्टा चालवणाऱ्यांशी कनेक्शन?, गुलाबराव देवकर यांचे गंभीर आरोप; जळगाव जिल्ह्यात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर खळबळजनक आरोप केले आहेत. जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. त्याला पालकमंत्र्यांचे आशीर्वाद आहेत...

गुलाबराव पाटील यांचं सट्टा चालवणाऱ्यांशी कनेक्शन?, गुलाबराव देवकर यांचे गंभीर आरोप; जळगाव जिल्ह्यात खळबळ
gulabrao patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 29, 2023 | 1:50 PM
Share

जळगाव : जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. तसेच जिल्ह्यात सट्टाही सुरू आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाळू माफिायंच्या भ्रष्टाचारात प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील सहभागी आहेत. पालकमंत्र्यांची वाहने दररोज धरणगाव तालुक्यात वाळू वाहण्यासाठी फिरत आहेत. गुलाबराव पाटील यांचा सट्टा चालवणाऱ्यांना आशीर्वाद आहे, असा गंभीर आरोप गुलाबराव देवकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गुलाबराव देवकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. या जिल्ह्यात वाळू माफियांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. या भ्रष्टाचारात प्रशासकीय यंत्रणा आणि पालकमंत्रीही सामील आहेत. पालकमंत्र्यांची वाहने रोज रेती वाहण्यासाठी धरगाव तालुक्यात फिरत आहेत. पालकमंत्रीच जर रेती वाहतूक करणार असेल आणि सट्टा चालवणाऱ्यांना त्यांचा आशीर्वाद असेल, बोगस रेशन विक्रेत्यांना त्यांचा आशीर्वाद असेल, दारू विक्रेत्यांना त्यांचा आशीर्वाद असेल तर जनतेने न्याया कुणाकडे मागायचा?, असा सवाल गुलाबराव देवकर यांनी केला आहे.

पालकमंत्री काय करत आहेत?

धरणगाव शहरात पायधी गावात टपऱ्या टपऱ्यावर दारू विकली जाते. सट्टा लावला जातो. हे पालकमंत्री काय करत आहेत? या जिल्ह्यातील, धरणगाव तालुक्याची अक्षरश: दैना सुरू आहे. युवकाचे जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम पालकमंत्री करत आहेत. त्यामुळे आम्ही प्रशासनाला जाब विचार आहोत. तुम्ही काय धोरण आखणार आहात? काय निर्णय घेणार आहात? बेरोजगारी वाढत आहे. शासन काही करत नाही. तरुण आत्महत्या करत आहेत. त्यावर सरकार काय उपाय करणार आहे? हा सुद्धा आमचा सवाल आहे, असं ते म्हणाले.

रक्षकच भक्षक

जे रक्षक असायला हवेत. तेच भक्षक झाले आहेत. त्यांच्याच माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली जात आहे. अवैध रेती वाहतुकीमुळे अपघात होत आहे. आमदार लता सोनावणे यांच्या वाहनाला अपघात झाला. तो रेतीचा ट्रक होता. आव्हाने गावात 15 दिवसांपूर्वी अपघात झाला होता. एका रिक्षाला वाळूच्या ट्रकने धडक दिली होती. रोज अपघात होत आहेत. पण प्रशासन काहीच करत नाही, त्याकडेही आम्ही प्रशासनाचे लक्ष वेधत आहोत, असं देवकर म्हणाले.

Follow Us
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर