AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी मदत देता का मदत ? अंकलीतल्या झोपडपट्टी पूरग्रस्तांची मदतीसाठी ठाकरे सरकारकडे याचना

शासनाच्या जागेत वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना महापूराची मदत मिळणार का ? असा प्रश्न अंकली या ठिकाणी निर्माण झाला आहे. गतवर्षीच्या महापूराची मदत मिळाली नाही,यंदाच्या महापुरात घरे अक्षरशः उध्दवस्त झाल्याने संसार उघड्यावर पडला आहे.

कुणी मदत देता का मदत ? अंकलीतल्या झोपडपट्टी पूरग्रस्तांची मदतीसाठी ठाकरे सरकारकडे याचना
अंकली झोपडपट्टी
| Edited By: | Updated on: Aug 01, 2021 | 9:02 PM
Share

सांगली: शासनाच्या जागेत वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना महापूराची मदत मिळणार का ? असा प्रश्न अंकली या ठिकाणी निर्माण झाला आहे. गतवर्षीच्या महापूराची मदत मिळाली नाही,यंदाच्या महापुरात घरे अक्षरशः उध्दवस्त झाल्याने संसार उघड्यावर पडला आहे.मात्र, अद्याप या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही.यंदा तरी मदत मिळावी,अशी याचना येथील झोपडपट्टी धारक पूरग्रस्त टाहो फोडून ठाकरे सरकारकडे करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सांगलीतील पूरस्थितीची ते पाहणी करणार आहेत. सांगलीचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त अंकलीतील पूरग्रस्तांच्या प्रश्नाकडं लक्ष देतात का हे पाहावं लागणार आहे.

अंकली गावातील झोपडपट्टी बुडाली

सांगली शहरानजीक असणाऱ्या अंकली गावात 40 कुटुंबांची वस्ती आहे. झोपडपट्टी म्हणून त्याला ओळखले जाते. कृष्णा नदीकाठी असणाऱ्या या वस्तीमध्ये पूर आला की पाणी शिरते,यंदा चाही महापुरात अंकली गावा बरोबर गावातली ही झोपडपट्टी बुडाली.त्यामुळे झोपडपट्टीतील कुटुंबांची घरं अक्षरशा उद्ध्वस्त झाली आहेत.पुराच्या पाण्याने अक्षरश थैमान घालत हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरीब कुटुंबांच्या घराची अवस्था ही होत्याची नव्हती केली आहे असं पूरग्रस्त मयुरी कांबळे यांनी सांगितलं आहे.

झोपडपट्टीची विदारक अवस्था

कोणाच्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत, कुणाचे छत कोसळले आहे,त्याचं घरच कोसळला आहे,अशी विदारक परिस्थिती झोपडपट्टीवासीयांची झाली आहे. मात्र, यांना शासनाची मदत मिळेल की नाही ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.कारण अंकली ग्रामपंचायतीकडून या झोपडपट्टी धारकांना शासनाच्या जागेवर घर असल्याने मदत मिळणार नसल्याचं सांगितले जात आहे.त्यामुळे महापुराने उध्वस्त झालेल्या या कुटुंबांचा संसार पुन्हा उभे राहणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

50 वर्षाहून अधिक काळापासून याठिकाणी या झोपडपट्टया आहेत. 2019 मधल्या महापुराच्या वेळी या ठिकाणी असणाऱ्या घरांची मोठी पडझड झाली होत.2019 मधील पुराची मदत अद्यापी मिळाली नाही,आता तरी या लोकांची घरं पूर्ण उध्वस्त झाली आहेत. शासनाकडून पडझड झालेल्या घरांच्या उभारणीसाठी मदत देण्यात येते.मात्र, इथल्या झोपडपट्टी धारकांना ती मिळणार का नाही ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे टाहो फोडून झोपडपट्टी धारकांना ठाकरे सरकारनं मदत द्यावी,अशी याचना पूरग्रस्त स्वप्नील हेगरे यांनी केली आहे.

ग्रामपंचायतीची भूमिका काय?

दरम्यान याबाबत अंकलीच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधला असता, गावातली सरसकट सर्व पंचनामे करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनामे होऊन सर्वांना ही मदत मिळेल आणि ते शंभर टक्के मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून शासनाच्या जागेवर अतिक्रमण असल्याने मदत न मिळण्याची शक्यता आहे,त्याबाबत उपमुख्यमंत्री ,विरोधी पक्ष नेते यांच्यासल निदर्शनास ही बाब आणून दिली असून अंकली ग्रामपंचायतीकडून 100 टक्के पंचनामे करून मदत देण्याची प्रयत्न असल्याचे ग्रामपंचायती कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर बातम्या:

झिका विषाणूचा पुरंदरच्या बेलसरमध्ये राज्यातील पहिला रुग्ण, प्रशासन ॲलर्ट मोडवर, 10 टीमकडून सर्वेक्षण सुरु

राज्य सरकारचा कारभार खोट बोल पण रेटून बोल, MPSC विद्यार्थ्यांसाठी आंदोलनाचा सदाभाऊ खोत यांचा इशारा

Sangli flood update Ankli village slum area residents ask for help to Thackeray Government

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.