AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded Rain | पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 जणांना वाचवण्यात एसडीआरएफच्या टीमला यश!

जिल्हामध्ये अनेक ठिकाणचे नागरिक पाणी साचल्याने घर सोडून सुरक्षित स्थळी निघून गेले आहेत. या भागात पावसामुळे हाहा:कार माजला असतांना महापालिकेची यंत्रणा किंवा आपत्ती व्यवस्थापन इथे पोहचले नाही. पावसाळ्यापूर्वी पालिकेने नालेसफाई केल्याचा दावा केला होता.

Nanded Rain | पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 जणांना वाचवण्यात एसडीआरएफच्या टीमला यश!
Image Credit source: tv9
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: | Updated on: Jul 09, 2022 | 12:27 PM
Share

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्हात कालरात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. नांदेड जिल्ह्यातील बामणी इथे नदीला (River) आलेल्या पुराच्या पाण्यात दोन मजूर अडकून पडले होते, एसडीआरएफच्या पथकासह गावकऱ्यांनी बचाव कार्य राबवत या दोन्ही मजुरांना वाचवलय. दोन्ही मजूर हे झारखंड (Jharkhand) राज्यातील असून पुलाच्या सुरू असलेल्या कामावर ते थांबले होते. रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने हे दोघे जण पुराच्या विळख्यात अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाने सकाळपासून मदतकार्य करत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले.

नांदेड शहरातील सखल भागात कमरे इतके पाणी साचले

नांदेड शहरातील सखल भागात कमरे इतके पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे यादरम्यान आपत्ती व्यवस्थापनाची टिम गायब आहे. नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. नांदेड शहरातील श्रावस्तीनगर, सादतनगर, तेहरा नगर, नोबेल कॉलनी या भागात कमरे इतक पाणी साचलं आहे. या भागात अनेक नागरिक अडकून पडले आहेत . घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून नुकसान झाले . अजूनही पाऊस सुरू असल्याने पाणी वाढतच आहे. इतकेच नाही तर अनेकांच्या घरामध्ये पाणी देखील शिरल्याचे कळते आहे.

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

जिल्हामध्ये अनेक ठिकाणचे नागरिक पाणी साचल्याने घर सोडून सुरक्षित स्थळी निघून गेले आहेत. या भागात पावसामुळे हाहा:कार माजला असतांना महापालिकेची यंत्रणा किंवा आपत्ती व्यवस्थापन इथे पोहचले नाही. पावसाळ्यापूर्वी पालिकेने नालेसफाई केल्याचा दावा केला होता. मात्र, चार तासाच्या पावसासोबत पालिकेचा दावा देखील वाहुन गेला. कारण श्रावस्तीनगर भागातील नाल्यातील पाणी या भागात साचले आहे. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे जिल्हामध्ये अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा देखील बंद असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

Follow Us
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!