AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Leopard : चंद्रपुरात थंड हवेसाठी अंगणात झोपला; बिबट्याने 70 वर्षीय व्यक्तीस उचलून नेले

उर्मी होते म्हणून ग्रामीण भागात काही लोकं अंगणात झोपतात. चंद्रपुरात अंगणात झोपलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला बिबट्याने रात्री उचलून नेले. त्यामुळं सरडपार चक गाव परिसरात बिबट्याची दहशत पुन्हा निर्माण झाली आहे.

Chandrapur Leopard : चंद्रपुरात थंड हवेसाठी अंगणात झोपला; बिबट्याने 70 वर्षीय व्यक्तीस उचलून नेले
बिबट्याने वृद्धावर हल्ला केल्याची घटना सिंदेवाही तालुक्यात घडली.Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 19, 2022 | 3:06 PM
Share

चंद्रपूर : गर्मीमुळे त्रस्त झालेले ग्रामीण भागातील लोक बाहेर अंगणात झोपतात. असेच झोपणे माणिक बुद्धा नन्नावरे (Manik Buddha Nannavare) यांच्या जीवावर बेतले. रात्री अंगणात झोपलेले असताना बिबट्याने हल्ला (Bibatyacha Halla) करीत जागीच ठार केले. ही घटना जिल्ह्यातील सरडपार चक (Sardpar Chak) येथे घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली. जंगलातील वन्यप्राणी गावात येऊन शिकार करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढलेला आहे. अंगाची लाही लाही सुरू आहे. ग्रामीण भागात नैसर्गिक थंड हवेसाठी गावकरी अंगणात झोपी जातात.

झोपले असताना हल्ला

सिंदेवाही तालुक्यातील सरडपार चक येथील 70 वर्षीय माणिक बुध्दा नन्नावरे हे अंगणात झोपले होते. त्याच दरम्यान बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात नन्नावरे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा सुरू आहे. उर्मी होते म्हणून ग्रामीण भागात काही लोकं अंगणात झोपतात. चंद्रपुरात अंगणात झोपलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला बिबट्याने रात्री उचलून नेले. त्यामुळं सरडपार चक गाव परिसरात बिबट्याची दहशत पुन्हा निर्माण झाली आहे.

वनविभागाचे अधिकारी म्हणतात काळजी घ्या

चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथे दोघांना बिबट्याने उचललं होतं. या घटनेचा अद्याप विसर झालेला नसताना सिंदेवाही तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे गावकरी धास्तावले आहेत. वन्यप्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. आता आम्ही घरीही अंगणात झोपायचे नाही काय, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. वनविभागाचे अधिकारी यावर काही बोलायला तयार नाहीत. नागरिकांनी काळजी घ्यावी, एवढच त्यांचं म्हणण आहे.

Curfew in Achalpur | अचलपुरात संचारबंदीचा दुसरा दिवस, शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा पुढं ढकलल्या; गावात तणावपूर्ण शांतता

Nitin Raut on Population | यंदाचं वर्ष लोकसंख्या नियंत्रण वर्ष म्हणून घोषित करा, डॉ. नितीन राऊत असं का म्हणालेत?

Chandrapur Temperature | चंद्रपुरात वीज वितरण यंत्रांनाच कुलर्स, का घेतली जातेय विशेष खबरदारी?

Follow Us
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?