AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar News : काळ आला होता पण…, सहलीला गेलेले विद्यार्थी घरी परतत होते, मात्र वाटेतच बसचे टायर निखळले अन्…

औरंगाबादचे विद्यार्थी नगरमध्ये पिकनिकला आले होते. पिकनिक एन्जॉय करुन परतीच्या प्रवासाला जात असतानाच काळाने घाला घातला. पण दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला.

Ahmednagar News : काळ आला होता पण..., सहलीला गेलेले विद्यार्थी घरी परतत होते, मात्र वाटेतच बसचे टायर निखळले अन्...
नगरमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला अपघातImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 14, 2023 | 10:52 AM
Share

अहमदनगर / 14 ऑगस्ट 2023 : औरंगाबादहून शिर्डी, भंडारदरा येथे पिकनिकला आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचे टायर निखळल्याने बसला अपघात झाला. या अपघातात चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. विद्यार्थी आणि शिक्षक बालंबाल बचावले. राहाता तालुक्यातील निर्मळप्रिंपी टोलनाक्यावर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सर्व विद्यार्थी औरंगाबाद येथील तापडीया कोचिंग इन्स्टीट्युटचे विद्यार्थी आहेत. बसच्या‌ समोरील उजव्या बाजूचा‌ टायर निखळला आणि बस थेट टोलनाक्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. या बसमध्ये 40 विद्यार्थी आणि चार ते पाच शिक्षक होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरु केले.

पिकनिकहून परतताना अपघात

पिकनिक करुन बस रात्रीच्या सुमारास औरंगाबादला परतत होती. राहाता तालुक्यातील निर्मळप्रिंप्री टोलनाक्यावर येताच बसचा टायर निखळल्यने अपघात झाला. यात चार ते पाच विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघात झाल्यानंतर बसचा दरवाजा लॉक झाला. मात्र बसची काच फुटल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनी तेथून बाहेर पडत आपली सुटका केली.

पोलीस आणि स्थानिकांनी मुलांना बाहेर काढले

दरम्यान, स्थानिक युवकांनी तातडीने बचावकार्य करत उर्वरित विद्यार्थीनींना बसमधून बाहेर काढले. लोणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत केली. पोलीस आणि स्थानिक युवकांनी पर्यांयी बसची उपलब्धता करून देत विद्यार्थी तसेच शिक्षकांना औरंगाबादकडे रवाना केले. बंद पडलेला निर्मळ प्रिंपी येथील टोलनाका अपघाताला कारणीभूत ठरत असून, तेथे लाईट आणि दुभाजकांवर रिफ्लेक्टर नसल्याने अनेक अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...