AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar News : काळ आला होता पण…, सहलीला गेलेले विद्यार्थी घरी परतत होते, मात्र वाटेतच बसचे टायर निखळले अन्…

औरंगाबादचे विद्यार्थी नगरमध्ये पिकनिकला आले होते. पिकनिक एन्जॉय करुन परतीच्या प्रवासाला जात असतानाच काळाने घाला घातला. पण दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला.

Ahmednagar News : काळ आला होता पण..., सहलीला गेलेले विद्यार्थी घरी परतत होते, मात्र वाटेतच बसचे टायर निखळले अन्...
नगरमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला अपघातImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 14, 2023 | 10:52 AM
Share

अहमदनगर / 14 ऑगस्ट 2023 : औरंगाबादहून शिर्डी, भंडारदरा येथे पिकनिकला आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचे टायर निखळल्याने बसला अपघात झाला. या अपघातात चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. विद्यार्थी आणि शिक्षक बालंबाल बचावले. राहाता तालुक्यातील निर्मळप्रिंपी टोलनाक्यावर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सर्व विद्यार्थी औरंगाबाद येथील तापडीया कोचिंग इन्स्टीट्युटचे विद्यार्थी आहेत. बसच्या‌ समोरील उजव्या बाजूचा‌ टायर निखळला आणि बस थेट टोलनाक्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. या बसमध्ये 40 विद्यार्थी आणि चार ते पाच शिक्षक होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरु केले.

पिकनिकहून परतताना अपघात

पिकनिक करुन बस रात्रीच्या सुमारास औरंगाबादला परतत होती. राहाता तालुक्यातील निर्मळप्रिंप्री टोलनाक्यावर येताच बसचा टायर निखळल्यने अपघात झाला. यात चार ते पाच विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघात झाल्यानंतर बसचा दरवाजा लॉक झाला. मात्र बसची काच फुटल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनी तेथून बाहेर पडत आपली सुटका केली.

पोलीस आणि स्थानिकांनी मुलांना बाहेर काढले

दरम्यान, स्थानिक युवकांनी तातडीने बचावकार्य करत उर्वरित विद्यार्थीनींना बसमधून बाहेर काढले. लोणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत केली. पोलीस आणि स्थानिक युवकांनी पर्यांयी बसची उपलब्धता करून देत विद्यार्थी तसेच शिक्षकांना औरंगाबादकडे रवाना केले. बंद पडलेला निर्मळ प्रिंपी येथील टोलनाका अपघाताला कारणीभूत ठरत असून, तेथे लाईट आणि दुभाजकांवर रिफ्लेक्टर नसल्याने अनेक अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान