AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadchiroli News : पाच मित्र पिकनिकला गेले होते, पण नियतीच्या मनात वेगळेच होते अन् पिकनिक जीवावर बेतली !

बऱ्याच दिवसांनी सर्व मित्र एकत्र भेटले होते. मग सर्वांनी पिकनिकचा प्लान केला आणि गोदावरी नदीवरील नरगम घाटावर गेले. मात्र ही पिकनिक दोघांसाठी अखेरची ठरली.

Gadchiroli News : पाच मित्र पिकनिकला गेले होते, पण नियतीच्या मनात वेगळेच होते अन् पिकनिक जीवावर बेतली !
Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 14, 2023 | 10:54 AM
Share

व्येंकटेश दुडमवार, टीव्ही 9 मराठी, गडचिरोली / 14 ऑगस्ट 2023 : पिकनिकला गेलेल्या दोन जणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गडचिरोलीत घडली आहे. सिरोंचा तालुका येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. मयतांपैकी एक अल्पवयीन आहे. हिमांशू मून असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिरोंचा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी सिरोंचा पोलीस पुढील तपास करत आहेत. दोघेही नागपूर येथील रहिवासी आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी दुथडी भरुन वाहत आहे. यामुळे नदीवर अंघोळीसाठी टाळण्याचे आवाहन करुनही तरुण मंडळी ऐकत नाहीत. यातूनच अशा घटना घडत नाहीत.

नागपूरही कार्यक्रमासाठी गडचिरोलीत गेले होते

हिमांशू मून हा नागपूर येथून आपल्या काही मित्रांसह एका कार्यक्रमासाठी सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे गेला होता. तेथून तो आपला मित्र सुमन मुंसेट्टी याला भेटण्यासाठी सिरोंचाजवळील चिंतलपल्ली येथे गेला. तेथून सर्व मित्रांनी गोदावरी नदीवरील नरगम घाटावर अंघोळीचा बेत केला. सर्वजण नरगम घाटावर पोहचले आणि अंघोळीसाठी नदीत उतरले. नागपूर जिल्ह्यातील पाच मित्र गडचिरोलीतील सिरोंचा येथील नरगम नदी घाटावर पिकनिकला गेले होते.

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले

नदीत अंघोळीसाठी उतरल्यानंतर खोल पाण्यात सर्वजण बुडू लागले. मात्र तिघे जण कसेबसे जीव वाचवून पाण्यातून बाहेर पडले. मात्र हिमांशु आणि सुमन पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले. यानंतर त्यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात पाठवले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.