AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंचगंगा नदीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची उडी, काहीही झालं तरी आम्ही जलसमाधी घेऊ, रविकांत तुपकर यांची भूमिका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिक्रमा यात्रा आता नृसिंहवाडीत पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नृसिंहवाडीत पंचगेगत उडी मारुन जलसमाधी घेऊन असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता.

पंचगंगा नदीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची उडी, काहीही झालं तरी आम्ही जलसमाधी घेऊ, रविकांत तुपकर यांची भूमिका
| Edited By: Chetan Patil | Updated on: Sep 05, 2021 | 4:51 PM
Share

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिक्रमा यात्रा आता नृसिंहवाडीत पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नृसिंहवाडीत पंचगेगत उडी मारुन जलसमाधी घेऊन असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांबाबत संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निर्णय घेतला नाही तर स्वाभिमानीने जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार स्वाभिमानीचे शेकडो कार्यकर्ते नृसिंहवाडीत पोहोचले. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात होता. पोलिसांनी काही विपरीत घडू नये यासाठी सर्व बंदोबस्त केला होता. तरीही काही कार्यकर्ते पंचगंगा नदीपात्रात जाण्यात यशस्वी झाले. एका शेतकऱ्याने थेट नदीपात्रात उडी घेतली. पण पोलिसांनी त्याला तातडीने बोटीत घेतलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याशी आम्ही बातचित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जलसमाधी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका मांडली. तसेही मरणार आणि असेही मरणार. त्यापेक्षा हक्कासाठी लढून मरण्यात एक आनंद आहे. आमचं इतिहासात तरी नाव घेतलं जाईल. याशिवाय लढण्याशिवाय हक्काचं मिळणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

रविकांत तुपकर नेमकं काय म्हणाले?

“सरकारने पूरग्रस्तांच्याबाबत आतापर्यंत निर्णय घेणं आवश्यक होतं. या पुरामुळे हजारो शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. सरकारने झोपेचं सोंग का घेतलं आहे? राजू शेट्टी यांनी पाच दिवसांपासून पदयात्रा सुरु केली आहे. वेळोवेळी इशारे आणि आंदोलने केली आहेत. सरकारला नेमकं किती शेतकऱ्यांना मारायचं आहे? शेतकऱ्यांना जलसमाधी घ्यायलाच लावायची आहे का, सरकारला किती शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे? हा आमचा सवाल आहे. काहीही झालं तरी शेतकरी जलसमाधी घेतीलच. या सरकारला गुपघे टेकायला आम्ही भाग पाडणारच. कितीही पोलीस बंदोबस्त असला तरीही आम्ही जाणार”, अशी भूमिका तुपकर यांनी मांडली.

“पोलिसांच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे. पण राज्य सरकारकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संपर्क करणं गरजेचं आहे. त्यांनी जाआर काढणं जरुरीचं आहे. तोंडी आश्वासनावर आमचा विश्वास राहिलेला नाही. सरकारच्या वतीने जबाबदार माणसाने चर्चा करुन ताबडतोब तोडगा काढणं अपेक्षित होतं. पणा तशा पद्धतीने झालेलं नाही. त्यामुळे आम्ही जलसमाधी आंदोलनावर ठाम आहोत. त्यामुळे त्यांना हे आंदोलन महागात पडणार आहे”, असं रविकांत तुपकर म्हणाले.

नाव वगळण्यात आल्यानंतर राजू शेट्टी आक्रमक?

आमदारकीच्या नावाचं काल-परवा चर्चेत आलेला विषय आहे. पूरग्रस्ताबाबत राजू शेट्टी यांनी अगोदरच मोर्चा काढला होता. चळवळीतल्या लोकांचं काम हे प्रस्तापितांना विरोधात लढणं, सामान्यांचा आवाज बुलंद करणं हे चळवळीतल्या लोकांचं काम असतं. ते काम आम्ही सातत्याने करतो. पण विरोधकांमा आमच्यावर टीका करायची आहे. पण त्याची आम्ही चिंता करत नाहीत, असं देखील रविकांत तुपकर म्हणाले.

हेही वाचा :

अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई, जरा धीर धरा, राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो; मुख्यमंत्र्यांनी फटकारले

फटे लेकीन हटे नही, राऊतांनी सांगितलं राहुल गांधींना शिवसेना वाढीचं नेमकं गुपित

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?