AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“उद्धव ठाकरे यांच्यावर भुंकण्यासाठीच ‘या’ पाळीव प्राण्याला भाजपने का पाळावं?”; ठाकरे गटाच्या नेत्याची नितेश राणे यांच्यावर पातळी सोडून टीका

नितेश राणे यांच्या वक्तव्यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर ती माहिती दाखव, कशाला ढुंगणाखाली घालून ठेवतोस. हिंमत नसेल तर राजकारणातून चालता हो अशा शब्दात त्यांन त्यांचा समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर भुंकण्यासाठीच 'या' पाळीव प्राण्याला भाजपने का पाळावं?; ठाकरे गटाच्या नेत्याची नितेश राणे यांच्यावर पातळी सोडून टीका
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 16, 2023 | 8:32 PM
Share

सिंधुदुर्ग : राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी गाजत आहे. तर दुसरीकडे आता शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने आलेले असतानाच ठाकरे गटाने भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना त्यांनी महाविकास आघाडीचे आगामी काळातील राजकीय भूमिका काय असणार याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवाव्यात असे तिन्ही पक्षांचे एकमत झालं आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.

यावेळी त्यांनी सांगितले की, ज्या पक्षाच्या जेवढ्या जेवढ्या जागा आहेत, त्या जागा त्या-त्या पक्षाकडे राहणार आहेत. शिल्लक राहिलेल्या जागांवर दोन नंबरला कोण होता, कोणाचा प्रभाव आहे याचा विचार करून वाटप केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेला 18 जागा मिळायलाच हव्यात व शिल्लक राहिलेल्या जागांबाबत ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट करतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.

विनायक राऊत यांनी यावेळी राणे दांपत्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपमध्ये मोठे दिग्गज नेते असताना कणकवलीमधून निवडून गेलेल्या आणि उकिरडा हुंगणाऱ्या या पाळीव प्राण्याला केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंवर भुंकण्यासाठी भाजपने का पाळाव?

नैतिक अधःपतन ज्या माणसाकडून केलं जातं, ज्या भाषेतून नको ते शब्द उच्चारले जातात हे भाजपला शोभा देणारे आहे का? भाजपच्या विचारवंतांना नितेश राणेची भाषा चालणार आहे का? चालणार असेल तर भाजपचे हे अधःपतन आहे. आणि चालणार नसेल तर ढुंगणावर लाथ मारून एक ना एक दिवस हाकलून लावणार असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

नितेश राणे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही गुन्हेगारीतून निर्माण झालेली आहे. त्यांचा जन्मच गुन्हेगारी प्रवृत्तीतून झालेला आहे. तर वडिलांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात किती खून झाले होते हे जगजाहीर आहे.

नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी रझा अकादमी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुप्त बैठक झाली होती असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

त्या नितेश राणे यांच्या वक्तव्यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर ती माहिती दाखव, कशाला ढुंगणाखाली घालून ठेवतोस. हिंमत नसेल तर राजकारणातून चालता हो अशा शब्दात त्यांन त्यांचा समाचार घेतला आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.