AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Accident : चिमुकलीसह जोडपे कौटुंबिक कार्यक्रमासाठी चालले होते, मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं, भरधाव ट्रक दुचाकीला धडकला अन्…

पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ग्रामीण भागात तर रस्त्यांची अत्यंत दयनीय स्थिती आहे. यामुळे रस्त्ये अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

Chandrapur Accident : चिमुकलीसह जोडपे कौटुंबिक कार्यक्रमासाठी चालले होते, मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं, भरधाव ट्रक दुचाकीला धडकला अन्...
चंद्रपूरमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 14, 2023 | 1:32 PM
Share

चंद्रपूर / 14 ऑगस्ट 2023 : कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने पती-पत्नीसह तीन वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जणही जखमी झाले आहेत. निलेश वैद्य आणि रुपाली वैद्य अशी मयत जोडप्याची नावे आहेत. राजुरा शहराजवळील धोपटाळा येथे ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी ताण निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. या रस्त्यांवर मोठमोठे खड्डेही पडले आहेत. यामुळे या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

रस्त्यावरील खड्डे आणि भरधाव ट्रकने केला घात

धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे राहणारे निलेश वैद्य हे पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलीसह बल्लारपूरला एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी चालले होते. यावेळी भरधाव ट्रक मागून येताना त्यांनी पाहिले. मात्र रस्त्यात मोठमोठे खड्डे असल्याने त्यांना बाईक साईडला घेत येत नव्हती. अखेर ट्रकने त्यांच्या बाईकला धडक दिली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. तिघांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोळसा खाणींमुळे राजुरा रोडवरुन मोठ्या प्रमाणात ट्रकची वाहतूक

राजुरा परिसरात कोळसा खाणी असल्याने या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक होत असते. यामुळे ट्रकचा वावर या परिसरात अधिक आहे. त्यातच या मोठमोठे खड्डे पडले आहे. मात्र प्रशासनाकडून या खड्यांच्या समस्येकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. यामुळे कधी ट्रकच्या धडकेत तर कधी खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अपघात वारंवार होत असतात. अनेकांना या अपघातात जीव गमवावा लागला आहे. यामुळे जनतेतून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.