AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्व विरोधक एकत्र आल्यास आपण जिंकू शकतो; उद्धव ठाकरे यांनी जॉर्ज फर्नांडिस यांचा सांगितलेला किस्सा काय?

आमच्याकडील लोकंही तुम्ही घेतले. त्यांच्यावर गोमूत्र शिंपडले का? आमच्या लोकांवर आताही चौकशी सुरू आहे. त्यांना पक्षात घेण्यासाठी सुरू आहे का? की पक्षात घेतल्यावर त्यांना क्लिनचीट देणार आहात का?

सर्व विरोधक एकत्र आल्यास आपण जिंकू शकतो; उद्धव ठाकरे यांनी जॉर्ज फर्नांडिस यांचा सांगितलेला किस्सा काय?
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 08, 2023 | 1:16 PM
Share

मुंबई : सर्व विरोधक जर का एकजिन्सीपणाने एकत्र आल्यास आपण जिंकू शकतो. कसब्याच्या निकालानेही तेच दाखवून दिलं आहे, असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधत हे विधान केलं. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली पाहिजे. शेतकऱ्यांच्या बांधावर सत्ताधाऱ्यांनी गेलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचं कौतुक करताना माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचा उद्धव ठाकरे यांनी किस्सा सांगितला. त्या काळात काँग्रेस जोरात होती. स. का. पाटील मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. स.का. पाटील यांच्या सारख्या मातब्बर उमेदवाराच्या विरोधात जॉर्ज फर्नांडिस उभे राहिले. जॉर्ज माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते. जॉर्ज नवखे होते. पण त्यांनी एक घोषणा दिली. आपण जिंकू शकतो. त्यांना पाडू शकतो, अशी घोषणा जॉर्ज यांनी दिली. सर्वांना वाटलं हा नवखा मुलगा काय करणार? पण जॉर्ज जिंकले. त्याच विजयाची कसब्याने आठवण करून दिली आहे. 30 वर्षाचा भाजपचा किल्ला आपण भूईसपाट करून जिंकू शकतो हा आत्मविश्वास केवळ पुणेकरच नाही तर महाराष्ट्रातील जनतेला दिला आहे. या निकालाने पुढची दिशा स्पष्ट केली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. या विजयाची आपण पुनरावृत्ती करू शकतो. आपण सर्वांनी पुढील निवडणुका एकत्र येऊन लढल्या पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

माझ्या मनात स्वप्ने नाही

मी पहिल्यांदा विधीमंडळात जाणार आहे. विषय असेल तर सभागृहात जाईल. मागच्यावेळी मी नागपूरला गेलो होतो. ज्या ज्यावेळी गरज असेल तेव्हा मी सभागृहात आणि विधीमंडळात जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्या मनात स्वप्न नाही. स्वप्नात राहणार नाही. जी जबाबादीरी आहे, ती पार पडतो. महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री ठरवताना काय घडलं ते मी सांगितलेलं आहे. माझ्या मनात कोणतंही स्वप्न नाही. देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम जनतेने केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ही सूड भावना नाहीये का?

राजकारणातील कटुतेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं होतं. त्यावरून त्यांनी फडणीसयांना फटकारलं. त्यांच्यासोबत जे गेले नाहीत त्यांच्यावर कारवाई होते, ते काय आहे? राजन साळवी, वैभव नाईक, अनिल परब आणि नितीन देशमुख यांच्यावर जे चाललंय ती सूड भावना नाहीये का? हा बदला नाहीये का? कुटुंबाच्या कुटुंबावर आरोपाची राळ उडवून टीका करून त्यांना उद्ध्वस्त करायचं आणि त्यातून काही साध्य होत नसल्याचं दिसलं की लाळघोटेपणा करायचा. मेघालयात तेच घडलं. आधी टीका केली. आता संगमाच्या बाजूला जाऊन बसले आहेत. जणू काही झालंच नाही अशा लाचारपद्धतीने संगमाच्या बाजूने गेले, असा हल्लाबोल त्यांनी केला. पॅचअपचा प्रस्ताव आला नाही. तुम्ही त्यांनाच विचारा. रोज उठून ठाकरेंविरोधात शिमगा करून काही होत नाहीये. लवकरच खोकेवाल्यांची होळी होणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

विरोधकांना धमकावलं जात आहे

आमच्याकडील लोकंही तुम्ही घेतले. त्यांच्यावर गोमूत्र शिंपडले का? आमच्या लोकांवर आताही चौकशी सुरू आहे. त्यांना पक्षात घेण्यासाठी सुरू आहे का? की पक्षात घेतल्यावर त्यांना क्लिनचीट देणार आहात का? हा सत्तापिपासूपणा आहे. विरोधकांना नामोहरम करणं सुरू आहे. पक्षात या नाही तर तुरुंगात जा, असं धमकावलं जात आहे. मध्य प्रदेशातील भाजपच्या एका मंत्र्यानेही विरोधी पक्षातील नेत्यांना दम दिलाय. भाजपमध्ये या नाही तर कारवाईला सामोरे जा. कारवाईच्या बुलडोझर फिरवू असं धमकावलं जात आहे. पण आता जनतेच्या मतांचा बुलडोझर या हुकूमशाहीविरोधात फिरवावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

तातडीने मदत करा

यावेळी शेतकऱ्यांना तातडीने मदत झाली पाहिजे, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना तातडीने मदत करा. घरातून कारभार केल्याचा माझ्यावर आरोप करत होतात ना. आता तुम्ही बांधाबांधावर जा. शेतकऱ्यांना तातडीने मदत करा. त्यांना अवकाळीच्या संकटातून बाहेर काढा, अशी मागणी त्यांनी केली.

Follow Us
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार