AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचवेळा डिलीट मिळूनही डॉक्टर पदवी का लावत नाही?; नितीन गडकरी यांनी सांगितलं कारण

मी या पात्रतेचा नाही, असं मला वाटते म्हणून डॉक्टर हे नाव लावण्यात मला संकोच होत असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

पाचवेळा डिलीट मिळूनही डॉक्टर पदवी का लावत नाही?; नितीन गडकरी यांनी सांगितलं कारण
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: Govinda Hatwar | Updated on: Feb 24, 2023 | 2:29 PM
Share

नांदेड : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज नांदेडमध्ये होते. रामानंद तीर्थ विद्यापीठाने नितीन गडकरी यांना डिलीट पदवी दिली. ती स्वीकारण्यासाठी ते येथे आले होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, मराठवाड्याची भूमी ही संघर्षाची भूमी आहे. सामाजिक, साहित्यिक, असे ऐतिहासिक असं हे नांदेड शहर आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ डिलीट देते आहे. विनम्रपणे ही डिग्री स्वीकारत आहे. त्यांच्या नावानं असलेल्या या विद्यापीठाची पाचवी डिलीट पदवी आहे. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पंजाबराव देशमुख अकोला कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी विद्यापीठ आणि तामिळनाडूतील एसआरएल विद्यापीठाने आतापर्यंत डिलीट पदवी दिली आहे. याशिवाय मार्चमध्ये नोएडा येथील विद्यापीठाकडून डिलीट मिळणार आहे. ही पदवी स्वीकारत असताना मनात ही भावना आहे. मी पात्रतेचा आहे की, नाही. मी या पात्रतेचा नाही, असं मला वाटते म्हणून डॉक्टर हे नाव लावण्यात मला संकोच होत असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं. यावेळी कमलकिशोर कदम यांना डिलीट देण्यात आली.

विद्यापीठातही पाणी जिरवायला हवं

नितीन गडकरी म्हणाले, मी हेलिकॉप्टरने येताना वाशिम-बुलढाणा येथून आलो. मला कोरडा दिसला आणि नांदेड आलं की पाणीच पाणी दिसलंय. देशात पाण्याची कमतरता नाही. पण ते जिरवायला हवं. विद्यापीठातही पाणी जिरवायला हवं, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते म्हणाले, आज शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. कारण शेतमालाला भाव मिळत नाही. अन्नदाता हा ऊर्जादाता बनायला हवा. तरुणांमध्ये ताकत आहे. त्यातून आपला देश महासत्ता बनू शकतो. विदेशात डॉक्टर, इंजिनिअर भारतातील सर्वाधिक आहेत.

वेल्थ क्रिएटर बना

युवकांना व्यावसायिक ज्ञान असावे. राहायला घर नाही, त्याला केंद्रबिंदू मानून आर्थिक, सामाजिक परिवर्तन केलं पाहिजे. देश समृद्धी सुखी झाला पाहिजे. गावं समृद्ध करा. रामानंद तीर्थ यांचं पवित्र असलेलं हे गाव. मनुष्यासाठी मरणाचा मनुष्य असतो. समाजातील शोषित पीडित केंद्रस्थानी मानून काम करा, असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला. माणूस जातीने नाही गुणाने मोठा असतो. मानवतेच्या आधारावर मुल्यांकन झालं पाहिजे. देश जगाची महाशक्ती बनली पाहिजे. अनिल काकोडकर हे अणूबाँबचे जनक आहेत. देशात सगळ्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत. कौशल्य विकास झाला पाहिजे. माणूस घडवणारे व्यक्ती बना. वेल्थ क्रियटर बना अशा शुभेच्छाही नितीन गडकरी यांनी युवकांना दिल्या.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....