यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी यशस्वी, अमरावतीत 48 तरुणांची नोकरी वाचवली

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मध्यस्थी केल्याने तब्बल 48 कामगारांचा रोजगार वाचला आहे.

यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी यशस्वी, अमरावतीत 48 तरुणांची नोकरी वाचवली
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 6:45 PM

अमरावती : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मध्यस्थी केल्याने तब्बल 48 कामगारांचा रोजगार वाचला आहे. अमरावती जिल्ह्यातील आपला नियोजित दौरा आटोपून यशोमती ठाकूर परतत असताना नांदगाव पेठ MIDC मध्ये काँग्रेसच्या कामगार सेलचे अध्यक्ष पंकज शेंडे यांच्या नेतृत्वाखाली काही कामगारांचे आंदोलन सुरू असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचल्या. कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करुन यशोमती ठाकूर यांनी 48 तरुणांची नोकरी वाचवली आहे.

सुदर्शन जिन्स नावाच्या एका कंपनीने 48 स्थानिक कामगारांना कामावरुन काढून टाकल्याने आंदोलन सुरू असल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनाची तातडीने दखल घेत मंत्री यशोमती ठाकूर यांनी कंपनी प्रशासनाला त्याच आंदोलनाच्या ठिकाणी बोलावले. तसेच 8 दिवस कामावर आले नाही म्हणून 48 कामगारांना कामावरुन काढता येणार नाही, असे बजावले.

कंपनी व्यवस्थापनाला तातडीने या कामगारांना कामावर परत घेण्याची सूचना यशोमती ठाकूर यांनी केली. कंपनीने कामगार कायद्याचे पालन करावे असेही त्यांनी सांगितले. पण त्याचबरोबर 8 दिवस न येणाऱ्या कामगारांनाही अशाप्रकारे सुटी घेणे चुकीचे असल्याचे सांगत यशोमती ठाकूर या वादावर आंदोलनाच्या ठिकाणीच तोडगा काढला.

चक्रीवादळग्रस्त नागरिकांना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा दिलासा

अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील वऱ्हा गावांमध्ये चक्रीवादळामुळे 61 घरांचे नुकसान आणि पडझड झालं होतं. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली या पाहणीनंतर त्यांनी प्रशासनाला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पंचनामे करून सानुग्रह अनुदान देण्याचेही निर्देश दिलेत. दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी नुकसानग्रस्तांना अन्नधान्य वाटप करून मदतीचा हातही दिला. तसेच या भागातील नुकसान ग्रस्तांची पाहणी करून त्यांचे योग्य ते पंचनामे करण्याचे आदेश ठाकूर यांनी प्रशासनाला दिले आहेत. हे पंचनामे लवकरात लवकर करून संबंधितांना सानुग्रह अनुदान लवकरात लवकर मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

इतर बातम्या:

कुठल्याही परिस्थितीत 5200 पदं तातडीने भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा, एकूण 12200 पदांची भरती

DGAFMS Recruitment 2021: सशस्त्र वैद्यकीय सेवेत 89 पदांवर भरती, दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

(Yashomati Thakur save job of forty eight workers of company in Amravati)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.