AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यवतमाळच्या शिवभक्तानं घरावरच छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला, आर्णीच्या सचिन भोयर यांची संकल्पना

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध शहरातील ढोल पथकांकडून वादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येत आहे.

यवतमाळच्या शिवभक्तानं घरावरच छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला, आर्णीच्या सचिन भोयर यांची संकल्पना
छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष
| Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 12:02 PM
Share

यवतमाळ : मार्च 2020 पासून कोरोना (Corona) विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून देशभरात निर्बंध लावण्यात आले होते. गेल्या वर्षी देखील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर असल्यानं उत्सवांवर निर्बंध होते. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती छोट्या स्वरुपात साजरी झाली होती. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केलीय जातीय. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध शहरातील ढोल पथकांकडून वादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येत आहे. सध्या राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरून राज्यभरात राजकारण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहेय. मात्र, यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील आर्णीच्या सचिन भोयर या शिवप्रेमी तरूणानं एक वेगळाच आदर्श घालून दिलाय. त्यानं चक्क आपल्या घरावरच शिवरायांचा पाच फुटांचा पुतळा स्वत:च्या खर्चातून उभारलाय. शिवाय तो दररोज नित्यनेमानं शिवपूजन करीत शिवजयंती साजरी करीत असतोय.

दिवसाची सुरुवात शिवाजी महाराजांना अभिवादन करुन

सचिन भोयर… यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचा हा शिवप्रेमी युवक आहे. सचिनचं आर्णीतलं घर लोकांसाठी कुतूहल आणि अभिमानाचा विषय बनलंय. त्याच्या घरासमोरून जाणारा प्रत्येकजण अदबीनं झुकतो अन नमस्कारही करतोय. हा नमस्कार असतोय छत्रपती शिवाजी महाराजांना… सचिननं आपल्या घरावरच छत्रपतींचा पाच फुटांचा सुंदर पुतळा बसविला आहेय. सचिनच्या दररोजच्या दिवसाची सुरूवातही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून होतेय.

घरावर पुतळा उभारण्याचं का वाटलं?

सचिनला लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांचा इतिहास, व्यक्तीमत्व आणि विचारांविषयी प्रचंड आकर्षण आणि अभिमान. यातूनच तो वर्षभर शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती करून देणारे विविध उपक्रम राबवित असतोय. यातूनच घर बांधतांनाच शिवरायांचा पुतळा उभारण्याचा विचार त्याच्या मनात आलाय. सार्वजनिक ठिकाणच्या पुतळ्यांची होणारी आबाळही त्यानं सातत्यानं पाहिलीय. त्याच्या या कृतीशील विचारांचा त्याचे शेजारी आणि मित्रांनाही अभिमान आहे.

अलिकडच्या काळात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांवरून राज्यभरात होत असलेलं राजकारण आणि चिखलफेक अस्वस्थ करणारी असल्याचं सचिनला वाटतंय. महाराजांना कृतीतून अंगीकारण्याचं आवाहन तो करतोय. ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी’, असं म्हटलं जातंय. शिवजयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज विचार आणि कृतीनं आपल्यात झिरपले तरच ती त्यांना खरी आदरांजली ठरेल, हेही तेव्हढंच खरं आहे.

इतर बातम्या:

नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे 4 महिन्यांत काम सुरू; किती मिळाला निधी, हायस्पीड ट्रेनचे स्वप्न सत्यात कधी?

Ajit Pawar | तुम्ही कुणाची सुपारी घेतलीये का?, अजित पवार संतापले

Follow Us
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.