AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीला वाचवण्यासाठी चार तरुणांच्या बंधाऱ्यात उड्या, एकाचा मृत्यू, मुलगी सुखरुप

मुलगी तिच्या आई वडिलांसोबत दुचाकीवरुन जात होती. त्यावेळी बंधाऱ्याच्या कठड्याला दुचाकी धडकली. त्यामुळे मुलगी थेट बंधाऱ्यात पडली.

मुलीला वाचवण्यासाठी चार तरुणांच्या बंधाऱ्यात उड्या, एकाचा मृत्यू, मुलगी सुखरुप
Satara youth drown
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 2:04 PM
Share

सातारा : बंधाऱ्यात पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. सातारा (Satara) जिल्हयातील फलटण तालुक्यातील कांबळेश्वरनगर इथं ही धक्कादायक घटना घडली. सुदैवाने मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र तिला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरता हळहळ व्यक्त केली जात आहे. जयेश संतोष भिसे (Jayesh Bhise) असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. (Youth Jayesh Bhise died while trying to save drowning girl at Phaltan Satara )

संबंधित मुलगी तिच्या आई वडिलांसोबत दुचाकीवरुन जात होती. त्यावेळी बंधाऱ्याच्या कठड्याला दुचाकी धडकली. त्यामुळे मुलगी थेट बंधाऱ्यात पडली. हे दृश्य पाहून जवळच असलेल्या चार तरुणांनी तिला वाचवण्यासाठी बंधाऱ्यात उड्या घेतल्या. मात्र त्यापैकी एक तरुण बुडाला.

या तरुणाला शोधण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम बोलवावी लागली. या टीमने बंधाऱ्यातून जयेश भिसेला शोधून काढलं. मात्र दुर्दैवाने बुडून त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, बंधाऱ्यात पडलेली मुलगी सुखरुप आहे. शिवाय अन्य तीन युवकही ठिक आहेत. पण एका तरुणाचा मृत्यू झाला.

सांगलीतही तीन मुलं वाहून गेली

तिकडे सांगलीतही अशीच धक्कादायक घटना घडली. आटपाडी तालुक्यात घाणंद नावाचं गाव आहे. याच गावात तीन भावंडं कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडलीय. यात दोन सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ आहे. विशेष म्हणजे ही तीनही भावंडं कालव्यावर मासेमारीसाठी गेली होती. त्यातच ती वाहून गेली. काळीज पिळवटून टाकणाऱ्या ह्या घटनेत कुत्रंही वाहून गेलं. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सापडला आहे. तीन भावंडांपैकी एकाच मृतदेह आज सकाळी सापडला आहे. दोन सख्ख्या भावंडांचा मात्र शोध सुरु आहे

संबंधित बातम्या 

एक फोन आला, बापाची नजर हटली, तीन मुलं वाहून गेली, ‘लुशी’चं काय झालं? सांगली हादरली

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.