AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानांनी जिथे हात लावला, तिथे अशुभ घडलंय, मोदींचा अमृतकाळ संपलाय; संजय राऊत यांची खोचक टीका

नीट घोटाळाप्रकरणी सरकारने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. या देशातले लाखो विद्यार्थी आज रस्त्यावर आलेत, त्यांचे पालक रस्त्यावर आले आहेत. एक पिढी बरबाद होताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री इतर सर्व विषयांवर बोलतात, टीका-टिपण्णी करतात. पण ते पुढे येऊन, 'नीट' वर किंवा अन्य राष्ट्रीय परीक्षांच्या घोटाळ्यावर का बोलले नाहीत, असा सवाल विचारत संजय राऊ यांनी मोदींवर टीका केली.

पंतप्रधानांनी जिथे हात लावला, तिथे अशुभ घडलंय, मोदींचा अमृतकाळ संपलाय; संजय राऊत यांची खोचक टीका
| Updated on: Jun 28, 2024 | 10:58 AM
Share

या देशातील सर्व प्रमुख विमानतळं ही मोदींच्या मित्रांच्या ताब्यात आहेत. भाजपला अर्थपुरवठा करणाऱ्या गुजरातच्या ठेकेदारांनी देशभरातली विमानतळं बांधली आहेत. फक्तं दिल्लीचं विमानतळ नव्हे तर जबलपुरचं विमानतळ सुद्धा आज कोसळलं. तीन महिन्यांपूर्वीच या विमानतळाचं उद्घाटन झालं. मोदींनी उद्घाटन केलेलं राम मंदिर पहिल्याच पावसामध्ये गळू लागलं. अख्खी अयोध्या पाण्याने तुंबली. १७ हजार कोटी खर्च करून तयार केलेल्या महाराष्ट्रातील अतल सेतूला तडे पडले. जिथे या सरकारच्या वतीने मोदी यांनी हात लावला, तिथे अशुभ घडलंय. मोदींचा अमृत काळ संपला आहे, आता अशुभकाळ सुरू झालाय, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

नीट घोटाळ्यावर पंतप्रधान का बोलत नाहीत ? 

आणीबाणीचा विषय ५० वर्षानंतर काढण्याचं काय प्रयोजन आहे. नीटवर त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. लाखो विद्यार्थी, पालक रस्त्यावर आहे. एक पिढी बरबाद होताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री इतर सर्व विषयांवर बोलतात, टीका-टिपण्णी करतात. पण ते पुढे येऊन, ‘नीट’ वर किंवा अन्य राष्ट्रीय परीक्षांच्या घोटाळ्यावर का बोलले नाहीत, असा सवाल विचारत राऊत यांनी मोदींवर टीका केली.

देशाचे शिक्षणमंत्री, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवलं पाहिजे. अशी मागणी संजय राऊत यांनी नीट परीक्षा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर केली. आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत मागणी केलीय की, आजचं कामकाज थांबवून फक्त नीट घोटाळ्यावर चर्चा करावी. मोदींनी त्यावर उत्तर द्यावं, असे राऊत म्हणाले.

जर सरकार आडमुठेपणाने वागत असेल तर सरकारला इंडिया आघाडीची ताकद दाखवावी लागेल.लोकसभेत आमची ताकद दुर्लक्षित करता येत नाही. सरकारला काठावर बहुमत आहे. भाजपला लोकसभेत बहुमत नाही. त्यामुळे आम्ही सरकारला लोकसभा आणि राज्यसभेत आम्ही आव्हान उभं करू, असं राऊत यांनी ठणकावलं.

हा सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

सरकारने आधीच अर्थसंकल्प फोडल्याचं चित्र काही वृत्तपत्रात बातम्या आल्या. अर्थसंकल्प फुटला. कालच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. हे सरकारचं निरोपाचं अधिवेशन आहे. निवडणुकीनंतर हे सरकार दिसणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार आहे. अर्थसंकल्पातल्या घोषणा मोदींनी लोकसभेत केल्या होत्या. तरीही त्यांना राज्यातील जनतेने पराभूत केलं.

Follow Us
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती