AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानांनी जिथे हात लावला, तिथे अशुभ घडलंय, मोदींचा अमृतकाळ संपलाय; संजय राऊत यांची खोचक टीका

नीट घोटाळाप्रकरणी सरकारने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. या देशातले लाखो विद्यार्थी आज रस्त्यावर आलेत, त्यांचे पालक रस्त्यावर आले आहेत. एक पिढी बरबाद होताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री इतर सर्व विषयांवर बोलतात, टीका-टिपण्णी करतात. पण ते पुढे येऊन, 'नीट' वर किंवा अन्य राष्ट्रीय परीक्षांच्या घोटाळ्यावर का बोलले नाहीत, असा सवाल विचारत संजय राऊ यांनी मोदींवर टीका केली.

पंतप्रधानांनी जिथे हात लावला, तिथे अशुभ घडलंय, मोदींचा अमृतकाळ संपलाय; संजय राऊत यांची खोचक टीका
| Updated on: Jun 28, 2024 | 10:58 AM
Share

या देशातील सर्व प्रमुख विमानतळं ही मोदींच्या मित्रांच्या ताब्यात आहेत. भाजपला अर्थपुरवठा करणाऱ्या गुजरातच्या ठेकेदारांनी देशभरातली विमानतळं बांधली आहेत. फक्तं दिल्लीचं विमानतळ नव्हे तर जबलपुरचं विमानतळ सुद्धा आज कोसळलं. तीन महिन्यांपूर्वीच या विमानतळाचं उद्घाटन झालं. मोदींनी उद्घाटन केलेलं राम मंदिर पहिल्याच पावसामध्ये गळू लागलं. अख्खी अयोध्या पाण्याने तुंबली. १७ हजार कोटी खर्च करून तयार केलेल्या महाराष्ट्रातील अतल सेतूला तडे पडले. जिथे या सरकारच्या वतीने मोदी यांनी हात लावला, तिथे अशुभ घडलंय. मोदींचा अमृत काळ संपला आहे, आता अशुभकाळ सुरू झालाय, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

नीट घोटाळ्यावर पंतप्रधान का बोलत नाहीत ? 

आणीबाणीचा विषय ५० वर्षानंतर काढण्याचं काय प्रयोजन आहे. नीटवर त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. लाखो विद्यार्थी, पालक रस्त्यावर आहे. एक पिढी बरबाद होताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री इतर सर्व विषयांवर बोलतात, टीका-टिपण्णी करतात. पण ते पुढे येऊन, ‘नीट’ वर किंवा अन्य राष्ट्रीय परीक्षांच्या घोटाळ्यावर का बोलले नाहीत, असा सवाल विचारत राऊत यांनी मोदींवर टीका केली.

देशाचे शिक्षणमंत्री, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवलं पाहिजे. अशी मागणी संजय राऊत यांनी नीट परीक्षा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर केली. आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत मागणी केलीय की, आजचं कामकाज थांबवून फक्त नीट घोटाळ्यावर चर्चा करावी. मोदींनी त्यावर उत्तर द्यावं, असे राऊत म्हणाले.

जर सरकार आडमुठेपणाने वागत असेल तर सरकारला इंडिया आघाडीची ताकद दाखवावी लागेल.लोकसभेत आमची ताकद दुर्लक्षित करता येत नाही. सरकारला काठावर बहुमत आहे. भाजपला लोकसभेत बहुमत नाही. त्यामुळे आम्ही सरकारला लोकसभा आणि राज्यसभेत आम्ही आव्हान उभं करू, असं राऊत यांनी ठणकावलं.

हा सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

सरकारने आधीच अर्थसंकल्प फोडल्याचं चित्र काही वृत्तपत्रात बातम्या आल्या. अर्थसंकल्प फुटला. कालच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. हे सरकारचं निरोपाचं अधिवेशन आहे. निवडणुकीनंतर हे सरकार दिसणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार आहे. अर्थसंकल्पातल्या घोषणा मोदींनी लोकसभेत केल्या होत्या. तरीही त्यांना राज्यातील जनतेने पराभूत केलं.

Follow Us
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?