AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain | पंढरपूर तालुक्यातील डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचं नुकसान, शेतकरी संकटात

पावसामुळं सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यात झालं आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी , कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.

Maharashtra Rain | पंढरपूर तालुक्यातील डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचं नुकसान, शेतकरी संकटात
| Updated on: Oct 12, 2020 | 1:49 PM
Share

सोलापूर: शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पंढरपूर शहरात सर्वाधिक 75 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसामुळं सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यात झालं आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी , कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. (pomegranate and grapes damaged due to rain in pandharpur)

पावसाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्याला देखील झोडपून काढले आहे. पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी , कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. विविध ठिकाणी फळबागांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागात सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंढरपूर तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पावसामुळे भीमा नदी गेले चार महिने नियमितपणे दुथडी भरून वाहत आहे. उजनी धरण शंभर टक्के भरले असून पावसाने तालुक्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. अनेक भागात पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत तर शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे मका, बाजरी या पिकांसह भाजीपाला आणि केळी पपई ,डाळिंब, द्राक्षे या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळं फळबागांना फटका बसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प हिंगणी शंभर टक्के भरला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यानं भोगावती नदीला पूर आला आहे. हिंगणी प्रकल्प भरल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

संबंधित बातम्या:

सोलापुरातील हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो,  भोगावती नदीला पूर

महाराष्ट्रावर आसमानी संकटाची शक्यता, 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

(pomegranate and grapes damaged due to rain in pandharpur)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.