Maharashtra Rain | पंढरपूर तालुक्यातील डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचं नुकसान, शेतकरी संकटात

पावसामुळं सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यात झालं आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी , कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.

Maharashtra Rain | पंढरपूर तालुक्यातील डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचं नुकसान, शेतकरी संकटात
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 1:49 PM

सोलापूर: शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पंढरपूर शहरात सर्वाधिक 75 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसामुळं सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यात झालं आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी , कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. (pomegranate and grapes damaged due to rain in pandharpur)

पावसाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्याला देखील झोडपून काढले आहे. पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी , कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. विविध ठिकाणी फळबागांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागात सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंढरपूर तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पावसामुळे भीमा नदी गेले चार महिने नियमितपणे दुथडी भरून वाहत आहे. उजनी धरण शंभर टक्के भरले असून पावसाने तालुक्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. अनेक भागात पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत तर शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे मका, बाजरी या पिकांसह भाजीपाला आणि केळी पपई ,डाळिंब, द्राक्षे या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळं फळबागांना फटका बसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प हिंगणी शंभर टक्के भरला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यानं भोगावती नदीला पूर आला आहे. हिंगणी प्रकल्प भरल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

संबंधित बातम्या:

सोलापुरातील हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो,  भोगावती नदीला पूर

महाराष्ट्रावर आसमानी संकटाची शक्यता, 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

(pomegranate and grapes damaged due to rain in pandharpur)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.