AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागाई, बेरोजगारी ते लाडकी बहीण, प्रियंका गांधींनी गडचिरोलीच्या सभेत सर्वच काढलं, भाजपावर जोरदार हल्लाबोल

गडचिरोलीमध्ये बोलताना प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महागाई, बेरोजगारी ते लाडकी बहीण, प्रियंका गांधींनी गडचिरोलीच्या सभेत सर्वच काढलं, भाजपावर जोरदार हल्लाबोल
| Updated on: Nov 17, 2024 | 3:36 PM
Share

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तेवीस नोव्हेंबरला शनिवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज गडचिरोलीच्या वडसा येथे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची प्रचार सभा झाली, या प्रचारसभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या प्रियंका गांधी? 

आमची घटना मजबूत, महाराष्ट्र ही मार्गदर्शक भूमी आहे. ही संघर्षाची भूमी आहे.  संतांनी एकजुटतेचा संदेश दिला. घटना सांगते, सर्वांचे प्रतिनिधित्व हवे. काँग्रेसनं मोठ्या संस्था उभारल्या, पण आज महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत. 10 लाख कोटींची गुंतवणूक बाहेर गेली. मोदींच्या राज्यात कुणीही सुरक्षित नाही, जिथे आम्ही सरकार बनविले, गॅरंटी दिली, लगेच पूर्ण केली. छत्तीसगडमध्ये आणि अन्य राज्यात हेच झाले. भाजपाचं या उलट आहे, यांच्याकडे उत्तर नाही. हे भावना भडकावून निवडणूक जिंकतात. यांनी उत्तरदायित्वाची परंपरा संपविली. काहीही बोलायचे आणि जिंकायचे असे चालणार नाही, असा घणाघात यावेळी प्रियकां गांधी यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महिला अधिक श्रम करतात. महागाई वाढली प्रत्येक गोष्टीवर जीएसटी आहे. शिक्षण घेणाऱ्याचे भविष्य नाही.  रोजगार नाही सरकार श्रमाचे समर्थन करत नाही. विमानतळ, पोर्टवर रोजगार मिळायचा पण आता तेही उदोगपतींना देत आहेत. सरकारी कंपन्यात कंत्राटी पद्धत सुरू आहे. बेरोजगारी वाढली आहे तरुणांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात पण योग्य धोरणं नाहीत. चरा महिन्यांपूर्वी लाडकी बहीण योजना आणली,, आपल्याकडून कर म्हणून घेतलेले पैसे आहेत, तेच देत आहेत.  आपल्या सर्वांवर टॅक्स वाढला, उद्योपतींवर नाही, कर्ज माफ केले नाही. शेतकरी अडचणीत आहेत, सोयाबीनला भाव मिळत नाही, असा हल्लाबोल प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर केला आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.