Congress : फॉर्म भरताना घोडेबाजार होणार होता हे तुम्हाला समजलं नाही का? काँग्रेस नेत्याचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल

Congress : "महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचे नुकसान होणार असेल तर काँग्रेसने स्वतंत्र पुढे जाणं महत्त्वाचं आहे" असं स्पष्ट मत काँग्रेस नेत्याने नोंदवलं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निर्णयावरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे.

Congress : फॉर्म भरताना घोडेबाजार होणार होता हे तुम्हाला समजलं नाही का? काँग्रेस नेत्याचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
Supriya Sule
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 10, 2026 | 2:04 PM

विधान परिषद निवडणुकीच्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात माघार घेतली. हा निर्णय पुणे काँग्रेसमध्य अनेकांना रुचलेला नाही. त्यांच्या मनात या बद्दल नाराजी आहे. पुणे शहराचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या बोलण्यातून ती नाराजी स्पष्टपणे जाणवली. शरद पवार यांच्या माघारीमुळे पुणे विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. महायुतीप्रमाणे महाविकास आघाडी सुद्धा एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. बहुतांश पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका भाजप, शिवसेना आणि सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. पण तरीही लोकशाही प्रक्रियेमध्ये मोकळं मैदान मिळू नये म्हणून महाविकास आघाडी सुद्धा ही निवडणूक लढवत आहे.

श्रीकांत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. पुण्यात मविआकडून ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटली होती. पण ऐनवेळी शरद पवारांनी माघार घेतली. श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी सुनेत्रा पवार यांनी थेट शरद पवार यांना फोन कॉल करुन विनंती केली. त्यानंतर .हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी स्वत: शरद पवार यांनी श्रीकांत पाटील यांना फोन कॉल केला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आपसातील समन्वयाने यावर मार्ग काढला. पण हा निर्णय पुणे काँग्रेसमध्ये अनेकांच्या पचनी पडलेला नाही हे अरविंद शिंदे यांच्या बोलण्यातून जाणवलं.

अरविंद शिंदे यांनी काय सवाल केला?

“महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचे नुकसान होणार असेल तर काँग्रेसने स्वातंत्र पुढे जाणं महत्त्वाचं आहे” असं स्पष्टपणे अरविंद शिंदे यांनी बोलून दाखवलं. ‘काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांच्या भावना म्हणून मी राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांना पत्र दिलं आहे’ असं ते म्हणाले. घोडेबाजार होणार होता, म्हणून माघार घेतली असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “खासदार सुप्रिया सुळे म्हणतात घोडेबाजार होणार होता म्हणून माघार घेतली मग फॉर्म भरताना घोडेबाजार होणार होत आहे तुम्हाला समजलं नाही का?” असा सवाल अरविंद शिंदे यांनी विचारला.

Follow Us