चेअरमन अंबादास गाटे आणि सेक्रेटरी गणेश बजरंग माने (वय 42, रा. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. तर कामगार कंत्राटदार दीपक अशोक वेताळ (वय 40, रा. मोशी) यांनी याविषयी तक्रार दाखल केली. वारजे माळवाडी येथे गृहप्रकल्प उभारला जाणार होता. यासाठी 218 सभासदांनी नावे नोंदविली होती. या सभासदांना सरकारकडून मिळणाऱ्या जागेवर घरे बांधून देण्याचे आमिष या आरोपींनी दिले होते. याविरोधात अशोक वेताळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दीपक वेताळ आणि अन्य सभासदांकडून जवळपास 1990पासून आजपर्यंत आरोपींनी वेगवेगळ्या प्रकारे रोख रकमा स्वीकारल्या. तसेच शासनाकडून 1 हेक्टर 76 गुंठे जमीनदेखील प्राप्त करून घेतली. या जागेवर 396 सदनिकांचा मोठा गृह प्रकल्प उभारण्यात आला. मात्र आता या प्रकल्पात मूळ सभासदांना सदनिका न देता भलत्याच व्यक्तींना त्या विकल्या. यामुळे आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.