AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीच्या विकासाचे मॉडेल कसे उभे राहिले?, अजित पवार यांनी सांगितलं

अनेक सहकारी तिथं राबत असतात. कष्ट घेत असतात. खासदार सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार, इतर सहकारी, घरातील महिला भगिनी सगळे जण राबत असतात.

बारामतीच्या विकासाचे मॉडेल कसे उभे राहिले?, अजित पवार यांनी सांगितलं
| Updated on: Apr 21, 2023 | 8:38 PM
Share

पुणे : बारामतीचे विकासाचे मॉडेल देशात माहिती आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, बारामती काही एका दिवसात तयार झाली नाही. १९६७ साली बारामतीला शरद पवार यांच्यासारखं नेतृत्व लाभलं. त्यावेळी २१ गावं बागायती होती. ४२ गाव जिरायती होती. तेव्हा ६३ गावांची ती बारामती होती. त्यावेळी अप्पासाहेब पवार यांनी बारामतीत काम केलं. अनेक सहकारी तिथं राबत असतात. कष्ट घेत असतात. खासदार सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार, इतर सहकारी, घरातील महिला भगिनी सगळे जण राबत असतात. आम्ही करताना जे चांगले अधिकारी आणतो. एका मुलाखतीत अजित पवार आज बोलत होते.

पिंपरी चिंचवडचा कालापालट करत असताना १९९१ ला खासदार झालो तेव्हा पुण्यातली लोकं बजाज, टेलको कंपनीत कामासाठी यायचे. संध्याकाळ झाली की, ते परत पुण्यात जायचे. कारण त्यांना चांगल्या सुविधा पिंपरी चिंचवडमध्ये मिळत नव्हत्या. त्यामुळे महत्त्वाच्या सुविधा पिंपरी चिंचवडमध्ये तयार केल्या. जेणेकरून पुण्यातल्या व्यक्तीला पिंपरी चिंचवडमध्ये राहता आलं पाहिजे. असं मनामध्ये ध्येय ठेवून कामाला लागलो.

त्यामुळे काम करणे सोपे झाले

शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि अधिकाऱ्यांची उत्तर साथ मिळाली. सतत पाच टर्म आमच्या विचाराचे नगरसेवक निवडून आले. त्यामुळे काम करणे सोपे गेले. केंद्रात शरद पवार असल्याने केंद्राचा निधी आणता आला. राज्यात आम्ही मंत्री होतो. त्यामुळे निधी आणता आला. त्यामुळे खऱ्या अर्थाने विकास झाला असल्याचं अजित पवार यांनी म्हंटलं.

टीमवर्क असावे लागते

कोणत्याही भागाचा विकास हा एका व्यक्तीने होत नाही. टीमवर्क असावे लागते. कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी शेवटच्या माणसापर्यंत व्हावी लागते. त्यासाठी टीम कामाला झोकून देणारी हवी असते. तेव्हा बदल होत असतात. स्वतःच्या घरचं काम आहे, असं समजून सकाळी सहा वाजता कामाच्या पाहणीला सुरुवात करतो, अस अजित पवार यांनी सांगितलं.

घरचे काम आहे समजून करतो

आमची जबाबदारी आहे. कर्तव्य आहे म्हणून आम्ही काम करतो. लोकांच्या विश्वासाला तडा घालू दिला जात नाही. आपली टर्म संपल्यानंतर लोकांनीही आपल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.