मावळ (पुणे) : मावळमधील (Maval) एकवीरा देवी (Ekvira devi temple) यात्रा उत्सव काळात तीन दिवस गड परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. एकवीरा गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी (Crowd) होईल म्हणून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 लागू केले आहे. मात्र त्यांच्या अजब आदेशाने भाविक संभ्रमात तर दुसरीकडे कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले असताना हा आदेश काढल्याने भाविकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कार्ला वाकसई, वरसोली, मळवली, वेहरगाव येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून या भागात भारतीय दंड विधान कलम 144 लागू केले आहे. यात शोभेची दारू, फटाके गडावर नेणे, मुक्या प्राण्यांची हत्या करणे आणि दारूबंदी आदेश परिसरात यात्रा काळात लागू करण्यात आले आहेत.