AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू’, कसब्यातील पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

कसबा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झालाय. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा झटका मानला जातोय. या पराभवानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.

'नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू', कसब्यातील पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Mar 02, 2023 | 5:22 PM
Share

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba by-election result) भाजप उमेदवार हेमंत रासणे (Hemant Rasane) यांचा पराभव झालाय. भाजपसाठी (BJP) हा खूप मोठा धक्का मानला जातोय. कारण गेल्या जवळपास तीन दशकांपासून या मतदारसंघात भाजपची सत्ता होती. पण काँग्रेसने या पोटनिवडणुकीत भाजपच्या वर्चस्वाला सुरुंग लावलाय. ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून कसब्यात प्रचंड राजकीय गदारोळ बघायला मिळाला. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्या. अखेर या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झालाय. या निवडणुकीवर भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय.

“कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील‌ जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

‘मराठी माणूस पैशात विकला जात नाही’

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावला आहे. राजकीय पक्षापेक्षा हा येथील विजय हा कार्यकर्त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे या विजयाचे खरे श्रेय हे कसब्यातील कार्यकर्त्यांना जाते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कसब्यातील एक सीट सौ के बराबर आहे असं म्हणून त्यांनी कसब्यातील जागेच महत्वही अधोरेखित केले आहे. साम,दाम ,दंड भेद सगळं वापरून बघितलं मात्र विजय कार्यकर्त्यांचा झाला असल्याचे सांगत त्यांनी हा विजय फक्त कार्यकर्त्यांमुळे मिळाला असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

“ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कसबा येथून भाजपची पकड सुटली आहे, फडणवीस आणि शिंदेंना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.