AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू’, कसब्यातील पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

कसबा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झालाय. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा झटका मानला जातोय. या पराभवानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.

'नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू', कसब्यातील पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Mar 02, 2023 | 5:22 PM
Share

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba by-election result) भाजप उमेदवार हेमंत रासणे (Hemant Rasane) यांचा पराभव झालाय. भाजपसाठी (BJP) हा खूप मोठा धक्का मानला जातोय. कारण गेल्या जवळपास तीन दशकांपासून या मतदारसंघात भाजपची सत्ता होती. पण काँग्रेसने या पोटनिवडणुकीत भाजपच्या वर्चस्वाला सुरुंग लावलाय. ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून कसब्यात प्रचंड राजकीय गदारोळ बघायला मिळाला. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्या. अखेर या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झालाय. या निवडणुकीवर भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय.

“कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील‌ जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

‘मराठी माणूस पैशात विकला जात नाही’

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावला आहे. राजकीय पक्षापेक्षा हा येथील विजय हा कार्यकर्त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे या विजयाचे खरे श्रेय हे कसब्यातील कार्यकर्त्यांना जाते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कसब्यातील एक सीट सौ के बराबर आहे असं म्हणून त्यांनी कसब्यातील जागेच महत्वही अधोरेखित केले आहे. साम,दाम ,दंड भेद सगळं वापरून बघितलं मात्र विजय कार्यकर्त्यांचा झाला असल्याचे सांगत त्यांनी हा विजय फक्त कार्यकर्त्यांमुळे मिळाला असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

“ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कसबा येथून भाजपची पकड सुटली आहे, फडणवीस आणि शिंदेंना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.