AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू धर्म नव्हे ‘एल्गार’च सडक्या मेंदूची; ब्राह्मण महासंघाचा हल्लाबोल

शर्जील उस्मानी या सडक्या मेंदुच्या व्यक्तीने एल्गार परिषदेत जी काही विधाने केली ती अनपेक्षित नव्हती. | Braham mahasangh

हिंदू धर्म नव्हे 'एल्गार'च सडक्या मेंदूची; ब्राह्मण महासंघाचा हल्लाबोल
आनंद दवे, अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ
| Updated on: Feb 02, 2021 | 10:59 PM
Share

पुणे: एल्गार परिषदेतील शरजील उस्मानी (sharjeel usmani)याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादात आता ब्राह्मण महासंघानेही (Brahman Mahasangh) उडी घेत एल्गार परिषदेला लक्ष्य केले आहे. हिंदू धर्म नव्हे तर एल्गार परिषदच सडक्या मेंदूच्या लोकांनी भरल्याची टीका, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली. (Brahman Mahasangh take a dig at elgar parishad)

ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या सर्व लोकांना फैलावर घेतले. शर्जील उस्मानी या सडक्या मेंदुच्या व्यक्तीने एल्गार परिषदेत जी काही विधाने केली ती अनपेक्षित नव्हती. तो काय आणि अरुंधती रॉय काय अशी सडकी, कुजलेली विधाने करण्याची शक्यता आहे, अशी शंका आम्ही पोलिसांकडे व्यक्त केलीच होती. ती दुर्दैवाने खरी ठरली, असे आनंद दवे यांनी म्हटले.

शर्जील उस्मानी या मूर्ख आणि विकृत माणसाला अद्दल घडवण्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही बुधवारी सकाळी 11.30 वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही आनंद दवे यांनी सांगितले.

आता ब्राह्मण महासंघ पुण्यात साजरा करणार हिंदू विजय दिवस

10 फेब्रुवारी हा हिंदू विजय दिवस आहे. 1771 साली याच दिवशी दिल्लीच्या लाल किल्यावर मराठ्यांचा भगवा फडकला होता. आम्ही हा दिवस हिंदू विजय दिवस म्हणून साजरा करणार आहोत. त्यासाठी गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी, यासाठी आम्ही राज्य सरकारकडे विनंती करणार असल्याचेही आनंद दवे यांनी सांगितले.

काहीपण ऐकून घ्यायला हिंदू रस्त्यावर पडलेत का?

शरजील उस्मानी नावाचा कोणीतरी सडक्या डोक्याचा व्यक्ती एल्गार परिषदेत हिंदूविरोधी वक्तव्य करतो. त्यानंतरही राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही. राज्यात मोगलाई आली आहे का, हिंदू रस्त्यावर पडलेत का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

राज्याचे गृहमंत्री म्हणतात या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करू. मात्र, शरजील उस्मानीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यामध्ये तो हिंदू समाजाला स्पष्टपणे सडका म्हटल्याचे ऐकायला मिळते. त्यानंतरही राज्य सरकार ऐकणार नसेल तर भाजप शांत बसणार नाही. आम्ही आंदोलन सुरु करू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

‘एल्गार परिषदेला परवानगी दिलीच का?’

एल्गार परिषद ही समाजात तेढ पसरवण्यासाठी आणि आग ओकण्यासाठीच आयोजित केली जाते. याचा अनुभव असूनही सरकारने एल्गार परिषद आयोजित करण्यास परवानगी दिलीच का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यामुळे ही सरकारची मिलीभगत आहे का, अशी शंका उत्पन्न होते. मात्र, सरकारने शरजील उस्मानीविरोधात कारवाई केलीच पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार

हिंदू समाज सडका झालाय म्हणणारा शरजील उस्मानी कोण आहे?

‘शिवसेनेला सत्तेसाठी मिंधी, कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन’, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

(Brahman Mahasangh take a dig at elgar parishad)

Follow Us
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने...
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने....
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं.
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.