AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार

आपल्या भाषणात शरजिल याने धार्मिक तेढ निर्माण करणारे व्यक्त केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार
| Updated on: Feb 01, 2021 | 7:29 PM
Share

पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात भाजपनं तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अॅड. प्रदीप गावडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आपल्या भाषणात शरजिल याने धार्मिक तेढ निर्माण करणारे व्यक्त केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शलजिलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.( BJP demands to file charges against Sharjeel Usmani for making provocative speech )

‘हिंदुस्तान मे हिंदू समाज बुरी तरिकेसे सड चुका है’, शरजिल उस्मानी याचं हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A आणि 295A अनुसार गुन्हा ठरते. या पुढे शरजिल उस्मानी यांनी भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत मी भारतीय संघराज्य मानत नाही असे विधान केले आहे. त्यांचे हे विधान भारतीय संघराज्याचा अपमान करणारे आणि भारतीय संघराज्याबाबत घृणा निर्माण करणारे आहे. जे की भारतीय दंडसंहितेच्या कलम 124A नुसार गुन्हा आहे, अशी तक्रार भाजपकडून करण्यात आली आहे.

एल्गार परिषदेचा संपूर्ण व्हिडीओ मागवला – गृहमंत्री

2017 मध्ये वादग्रस्त ठरलेली एल्गार परिषद यंदा शांततेत पार पडली आहे. या परिषदेत अनेक पुरोगामी नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. या परिषदेवरुन पुन्हा कुठला वाद निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकार आधीच सावध झालं आहे. या संपूर्ण परिषदेचा व्हिडीओ राज्य सरकारनं मागवून घेतल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीय. पुण्यात 30 जानेवारी रोजी एल्गार परिषद पार पडली. त्यात निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, लेखिका अरुंधती रॉय यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

2017 च्या एल्गार परिषदेनंतर वाद

2017 मध्ये पुण्यातील शनिवारवाडा इथं एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा इथं हिंसाचार उसळला होता. त्याचा थेट संबंध पुण्यातील एल्गार परिषदेशी जोडण्यात आला. त्यामुळे या परिषदेत सहभागी अनेक मोठ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील काही लोक आजही कारागृहात आहेत.

संबंधित बातम्या : 

सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली तरी एल्गार परिषद घेऊच; तुरुंग, मरणाला घाबरत नाही: कोळसे-पाटील

मोठी बातमी: पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी नाकारली

BJP demands to file charges against Sharjeel Usmani for making provocative speech

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.