AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क, खासदार अमोल कोल्हे संतप्त, थेट अर्थमंत्र्यांना लिहिले पत्र

central govt imposes 40 persent duty on onion : केंद्र सरकार ३१ डिसेंबरपर्यंत कांदा निर्यातीवर शुल्क लावले आहे. तसेच नाफेडने खरेदी केलेला कांदा बाजारात आणण्याची तयारी चालवली आहे. याविरोधात शेतकरी आणि विरोधक एकटवले आहेत.

कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क, खासदार अमोल कोल्हे संतप्त, थेट अर्थमंत्र्यांना लिहिले पत्र
| Updated on: Aug 20, 2023 | 2:21 PM
Share

पुणे | 20 ऑगस्ट 2023 : केंद्र सरकारने देशातंर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन निर्यातीवर तब्बल ४० टक्के शुल्क लावल्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकार ३१ डिसेंबरपर्यंत कांदा निर्यातीवर शुल्क लावले आहे. तसेच नाफेडने खरेदी केलेला कांदा बाजारात आणण्याची तयारी चालवली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकरी संघटना आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. संघटनांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. तसेच विरोधकांनी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे म्हटले आहे. आता शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला थेट पत्र लिहिले आहे.

काय म्हणातात खासदार डॉ. अमोल कोल्हे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केला आहे. शासनाचा हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा आहे. केंद्र सरकारचे धोरण शेतकरीद्रोही आहे. सरकार एकीकडे शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची घोषणा करते. शेतकरी सन्मानाची भाषा करते. दुसरीकडे शेतकऱ्यांचे नुकसान करणारे निर्णय घेते. दीर्घ कालावधीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे तर निर्यात शुल्क लागू केले गेले आहे. शेतकऱ्यांना चार पैसे मिळताना कधी निर्यातबंदी आणली जाते, त्यामुळे शेतमालाचे भाव पडतात. म्हणजेच शेतकऱ्याला आर्थिक संकटातून बाहेर येऊ द्यायचे नाही, असे धोरण केंद्र सरकारचे आहे.

शेतकरी अडचणीत

यंदा पावसाने ओढ दिली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस नाही. यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. त्यात कांदा निर्यातीवरील ४० टक्के निर्यात शुल्क सरकारने लागू केले आहे. शासनाच्या अशा निर्णयामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील लागू केलेली ४० टक्के शुल्क रद्द करावे, अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी पत्रातून मांडली आहे.

धनंजय मुंडे म्हणातात

कांद्यावर लावलेल्या ४० टक्के शुल्कासंदर्भात आपण केंद्र सरकारशी चर्चा करु आणि हा प्रश्न तातडीने सोडवू, अशी भूमिका राज्याते कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी केंद्र सरकारने निर्यात बंदी केलेली नाही. चुकीचा प्रचार केला जात असल्याचे नाशिकमध्ये म्हटले आहे.

Follow Us
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....