AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi: ‘मी काय बोलावं हे पण तुम्हीच सांगा’ राहुल गांधींचा लोकसभेत संताप, ओम बिर्लांचं तडक उत्तर काय?

Union Budget 2026: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याला लोकसभेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला. आजही सभागृहात मोठा गोंधळ दिसला. अमेरिका आणि चीन यांच्या मुद्दावर आपल्याला मतच मांडू दिल्या जात नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. काय घडलं लोकसभेत?

Rahul Gandhi: 'मी काय बोलावं हे पण तुम्हीच सांगा' राहुल गांधींचा लोकसभेत संताप, ओम बिर्लांचं तडक उत्तर काय?
राहुल गांधी, ओम बिर्ला Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 03, 2026 | 3:35 PM
Share

Rahul Gandhi Heated Conversation with Om Birla: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यात शा‍ब्दिक चकमक उडाली. काँग्रसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कोणत्याही पुराव्याशिवाय एक वक्तव्य वाचत होते. त्यावर संसदेच्या नियमांचा पाढा वाचत ओम बिर्ला यांनी त्यांना हटकले. बिर्ला यांनी या प्रकारावर तीव्र हरकत घेतली. राहुल गांधी यांचा ही संताप झाला. आता तुम्हीच सांगा मी काय बोलावं, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यावर पुन्हा बिर्ला यांनी स्पष्टीकरण दिले. त्यावर मी तुमचा सल्लागार नाही. मात्र नियमानुसार हे सभागृह चालवण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याचे बिर्ला यांनी सुनावले. गेल्या दोन दिवसांपासून अमेरिका, चीन या मुद्यावर आपल्याला मत व्यक्त करू दिले जात नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी यांचा मुद्दा काय?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बजेट सत्राच्या दुसर्‍या दिवशी सोमवारी सभागृहातील चर्चे दरम्यान भारतीय लष्करातील एका माजी अधिकाऱ्याची छापून आलेली प्रतिक्रिया वाचली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याप्रकारावर लागलीच हरकत घेतली. नियमानुसार दुजोरा नसलेली आणि कोणतीही अधिकृत नसलेली माहिती गांधी वाचत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी त्यासाठी नियमांचा आधार घेतला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना असे न करण्याचा इशारा दिला.

दोघांमध्ये शा‍ब्दिक चकमक

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे म्हणाले की, “सभागृहात विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही आरोप लावत आहात. पण तुम्ही नियमांचं पालन केले नाही. ही कृती काही योग्य नाही.” लोकसभेतील कामकाज हे नियमानुसार व्हावे ही त्यांची जबाबदारी आहे. सदस्यांना वारंवार या नियमांच्या पालन करण्याची आठवण करून देण्याची वेळ येऊ देऊ नका असे ताशेरे बिर्ला यांनी ओढले. त्यावर, “अध्यक्ष महाराज, आपण एक काम करा. तुम्हीच मला सांगा की मी काय बोलावं” असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांची ही तिरकस टिप्पणी बिर्ला यांना आवडली नाही. मी तुमचा सल्लागार नाही, पण अध्यक्ष म्हणून माझे हे कर्तव्य आहे की सभागृह हे नियमानुसार चालावे आणि यादीतील विषयावरच चर्चा व्हावी. त्याव्यतिरिक्त इतर विषयावर चर्चा होऊ नये अशी कडक भूमिका बिर्ला यांनी मांडली. आजही लोकसभेत गोंधळ दिसून आला. आपल्याला सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Follow Us
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.