AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajgurunagar : स्वागतार्ह..! वाढदिवसानिमित्त स्वखर्चानं उचलला पुणे-नाशिक महामार्गावरचा कचरा; राजगुरूनगरातल्या दाम्पत्याचा उपक्रम

राजगुरूनगर येथील संतोष उर्फ पप्पूशेठ मुरलीधर राक्षे आणि त्यांची पत्नी राणी संतोष राक्षे यांनी वाढदिवसाच्या (Birthday) निमित्ताने समाजाच्या हिताचे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून हे कार्य केले.

Rajgurunagar : स्वागतार्ह..! वाढदिवसानिमित्त स्वखर्चानं उचलला पुणे-नाशिक महामार्गावरचा कचरा; राजगुरूनगरातल्या दाम्पत्याचा उपक्रम
वाढदिवसानिमित्त राजगुरूनगरातील कचरा राक्षे पती-पत्नीने स्वखर्चातून उचललाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 01, 2022 | 3:28 PM
Share

राजगुरूनगर, पुणे : राजगुरूनगर (Rajgurunagar) येथील एका पती-पत्नीने वाढदिवसानिमित्त पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्या पुलाजवळील मोठ्या प्रमाणात लोकांनी टाकलेला कचरा स्व:खर्चातून जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलून नेत परिसर स्वच्छ केला. हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मभूमीत प्रवेश करताना परिसर स्वच्छ (Clean) ठेवला पाहिजे, याची जाणीव ठेवावी ही अपेक्षा करता या परिवाराने वाढदिवशी सामजिक उपक्रम हाती घेत परिसर स्वच्छ केला आहे. राजगुरूनगर येथील संतोष उर्फ पप्पूशेठ मुरलीधर राक्षे आणि त्यांची पत्नी राणी संतोष राक्षे यांनी वाढदिवसाच्या (Birthday) निमित्ताने समाजाच्या हिताचे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून हे कार्य केले. राक्षे पती-पत्नीने हुतात्मा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष कैलास दुधाले यांच्याकडे सल्ला घेतला. त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा उपक्रम राबविला.

कचऱ्यामुळे दुर्गंधी

राजगुरूनगर हे शहर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी कचरा पाहायला मिळतो. शहरातील पुणे-नाशिक महामार्गावर पडलेल्या कचऱ्याने दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे त्याठिकाणची स्वच्छता महत्त्वाची होती. हा दृष्टीकोन ठेवून समाजहित साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. राक्षे यांनी मग कोणताही विचार न करता शहराच्या जवळ असलेला हा कचरा स्वखर्चाने जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साह्याने उचलत संपूर्ण परिसर साफ करून वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम हाती घेतला.

‘स्वच्छचा ठेवा’

वाढदिवसानिमित्त जरी स्वखर्चाने परिसर स्वच्छ केला असला तरी नागरिकांनी आपल्या परिसराची स्वच्छता नेहमीच ठेवायला हवी, असे मत संतोष राक्षे यांनी मांडले. ऐतिहासिक दृष्टीने शहर महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने परिसर अस्वच्छ असणे रोगाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, जेणेकरून प्रशासनावरदेखील ताण येणार नाही. अनेक ठिकाणी कचराकुंड्या आहेत. बऱ्याचवेळा नागरिक लांबूनच कचरा फेकतात. त्यामुळे कचराकुंडीच्या आसपासचा परिसर अस्वच्छ झालेला असतो. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवत रोगराईला आमंत्रण देईल, अशी अस्वच्छता टाळावी, असे ते म्हणाले.

शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!.
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला.
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल.
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल.
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले.
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल.