AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“काँग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही”; शरद पवार यांनी काँग्रेसच्या इतिहासाबरोबरच संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास मांडला

मागील काही दिवसांपासून राजकीय टीका करण्याबरोबरच काही लोकांकडून भारत काँग्रेस मुक्त करायचा आहे अशी वल्गना केली जाते आहे. पण काँग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काँग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही; शरद पवार यांनी काँग्रेसच्या इतिहासाबरोबरच संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास मांडला
| Updated on: Dec 28, 2022 | 9:49 PM
Share

पुणेः भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 137 व्या वर्धापनदिनी महापुरुषांचे छायाचित्र प्रदर्शनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेस भवनला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी प्रदर्शन पाहत असताना काँग्रेसने भारताला दिलेल्या भरीव कामगिरीची आठवण करून देत त्यांनी काँग्रेसच्या राजकारणाची आणि संयुक्त महाराष्ट्राचाही त्यांनी इतिहास सांगितला. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याचीही शरद पवार यांनी आठवण करून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचा इतिहास सांगताना त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनाच्या निमित्ताने राजकीय, सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीचा त्यांनी गौरव केला.

यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास सांगताना इंदिरा गांधी यांच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू यांना कन्व्हीन्स केल्या नंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली असंही त्यांनी यावेळी सांगताना अधोरेखित केले.

मागील काही दिवसांपासून राजकीय टीका करण्याबरोबरच काही लोकांकडून भारत काँग्रेस मुक्त करायचा आहे अशी वल्गना केली जाते आहे. पण काँग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

देशासाठी काँग्रेसची विचारधारा आणि योगदान कुणालाच दुर्लक्षित करता येणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट करून सांगितले. काँग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील आणि तसे मतभेद माझेही काही आहेत मात्र काँग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल 24 वर्षांनंतर पुण्यातील काँग्रेसला भेट दिली आहे. त्यामुळे  काँग्रेससह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली होती.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.