AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांना सीबीआय समन्स, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले. केजरीवाल यांचे कधीकाळी गुरु म्हणून ओळखले जाणारे समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांना सीबीआय समन्स, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया
arvind kejriwal and anna hazareImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Apr 16, 2023 | 11:50 AM
Share

पुणे : दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात सीबीआयने आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चौकशीसाठी समन्स बजावले. यासाठी केजरीवाल यांना येत्या 16 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात असताना अरविंद केजरीवाल यांचे गुरु म्हणून ओळखले जाणारे अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. अण्णा हजारे यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले अण्णा हजारे

केजरीवाल यांच्या चौकशीसंदर्भात अण्णा हजारे पुढे म्हणाले की, मी यापूर्वीही केजरीवाल यांना पत्र लिहिले होते. तुम्ही दारूबद्दल का विचार करता, चांगल्या गोष्टींचा विचार करा, पैशासाठी काहीही करणे योग्य नाही, दारूने कधीही कोणाचे भले झाले नाही, असे त्यात लिहिले होते. आता या प्रकरणी सीबीआयने चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत केजरीवाल दोषी आढळल्यास शिक्षा झाली पाहिजे.

माझ्यासोबत जेव्हा केजरीवाल होते, तेव्हा त्यांना नेहमी विचार आणि आचरण शुद्ध ठेवा,असे सांगत होतो. मनिष सिसोदिया यांच्यासारखे व्यक्ती तुरुंगात आहे.याबद्दल खूप वाईट वाटते. स्वत:साठी नाही तर समाज आणि देशासाठी नेहमीच चांगले असावे, हाच माझा सर्वांना सल्ला आहे, असे अण्णा यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण

सीएम केजरीवाल यांनी मद्यविक्रेते आणि अबकारी धोरण घोटाळ्यातील मुख्य आरोपी समीर महेंद्रू यांच्याशी फेसटाइम कॉलवर चर्चा केली. हे संभाषण आम आदमी पार्टीचे संपर्क प्रभारी विजय नायर यांनी केले. ईडीच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी 12 आणि 15 नोव्हेंबर रोजी चौकशीदरम्यान समीर महेंद्रूने अधिकाऱ्यांना सांगितले होते की विजय नायरने अरविंद केजरीवाल यांच्याशी त्यांची भेट घडवून आणली होती, परंतु जेव्हा चर्चा निष्पन्न झाली नाही तेव्हा विजयने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या फेसटाइम कॉलवर बोलावले. अरविंद केजरीवाल यांनी केजरीवाल यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा केली.

सिसोदिया यांना झाली आहे अटक

सीबीआयने या प्रकरणात याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही अटक केली होती. सीबीआयने मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारीला अटक केली होती. सिसोदिया यांची ईडीनेदेखील चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने जेलमधून मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. ईडीने नंतर रिमांडवर घेऊनही सिसोदिया यांची चौकशी केली होती. या प्रकरणी सिसोदिया यांनी राउज ऐवन्यू कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. पण कोर्टाने तो अर्ज फेटाळला होता.

Follow Us
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा.
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला.
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप.
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ.
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला.
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?.