AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माता-भगिनींनो, सरकारच्यावतीने माफी मागतो, हसन मुश्रीफ यांनी माफी का मागितली?

कागलमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील 21 कुटुंबाना अर्थसहाय्याचे वाटप हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. Hasan Mushrif

माता-भगिनींनो, सरकारच्यावतीने माफी मागतो, हसन मुश्रीफ यांनी माफी का मागितली?
हसन मुश्रीफ
| Updated on: Apr 09, 2021 | 4:47 PM
Share

कोल्हापूर: माता -भगिनींनो, उशिरा अनुदानाबद्दल सरकारच्यावतीने माफी मागतो, हे शब्द राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आहेत. कागलमध्ये दारिद्र्य रेषेखालील 21 कुटुंबाना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य अनुदानाचे वाटप करण्यात आले. त्या कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांनी या भावना व्यक्त केल्या. कागलमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील 21 कुटुंबाना हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मदत सुपूर्द करण्यात आली. ( Hasan Mushrif distribute amount of govt scheme to BPL Ration card holders family member at kagal)

हसन मुश्रीफांनी माफी का मागितली?

गेल्या वर्षभरात दारिद्र्यरेषेखालील 21 कुटुंबातील कर्त्या कुटुंब प्रमुखांचे मृत्यू झाले. त्या कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून मिळणारं अनुदान त्या कुटुंबाना देण्यास उशीर झाल्यानं माता-भगिनींनो, मी राज्य सरकारच्यावतीने माफी मागतो, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

21 कुटुंबांना अर्थसहाय्य

कागलमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील 21 कुटुंबाना अर्थसहाय्याचे वाटप झाले. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळतो. प्रापंचिक घडीच विस्कटते. म्हणून मी विशेष सहाय खात्याचा मंत्री असताना अशा कुटुंबाला वीस हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

कोरोना महामारीमुळं उशीर

गेल्या वर्षभरात तालुक्यातील 21 कुटुंबावर आघात होऊनही कोरोनामुळे हे अनुदान मिळाले नव्हते. कारण, कोरोना महामारीमुळे राज्याला एक लाख 53 हजार कोटींची तूट आली आहे. त्यामुळे, काही योजना मागे ठेवाव्या लागल्या होत्या. परंतु, सततच्या पाठपुराव्यामुळे मदत देता आली, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना नेमकी काय?

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना किंवा राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना दारिद्रय रेषेखालील कुटंबासांठी राबवली जाते. दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियाना एकर रकमी 20 हजार रुपयांचं अर्थसहाय्य केलं जातं. हा अर्ज जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यलायात, तलाठी कार्यालयात दाखल करता येतो. किंवा सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवरुन भरता येतो.

संबंधित बातम्या:

Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचे संकेत, मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्र्यांनी बाह्या सरसावल्या, फडणवीस, राज ठाकरेंसह सर्वपक्षीयांना पुन्हा बोलावलं, कडक लॉकडाऊनची शक्यता

( Hasan Mushrif distribute amount of govt scheme to BPL Ration card holders family member at kagal)

Follow Us
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.