AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : आकाशवाणीचा पुणे वृत्तविभाग होणार बंद! दोन अधिकाऱ्यांना इतरत्र हलवलं

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B Ministry) पुण्यातील (Pune) आकाशवाणीचे (All India Radio) प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याबरोबरच अलाहाबाद, भूज, धारवाड, कोईम्बतूर, धारवाड, दिब्रुगड आणि इंदूर येथील प्रादेशिक वृत्त विभागही बंद ठेवण्यात आले आहेत.

Pune : आकाशवाणीचा पुणे वृत्तविभाग होणार बंद! दोन अधिकाऱ्यांना इतरत्र हलवलं
पुणे आकाशवाणीImage Credit source: Sahapedia
| Updated on: Apr 11, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B Ministry) पुण्यातील (Pune) आकाशवाणीचा (All India Radio) प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याबरोबरच अलाहाबाद, भूज, धारवाड, कोईम्बतूर, धारवाड, दिब्रुगड आणि इंदूर येथील प्रादेशिक वृत्त विभागही बंद ठेवण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या ताज्या आदेशानुसार, पुण्यात वरिष्ठ पदावर असलेल्या दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात येत आहे. पुण्यातील आकाशवाणी येथील अधिकाऱ्यांनी खुलासा केला, की ज्या दोघांना स्थलांतरित केले जात आहे त्यांच्यासाठी मंत्रालयाने कोणतीही बदली केलेली नाही. याचा अर्थ, त्यांनी पुणे इतर इतर शहरांमधील प्रादेशिक बातम्या युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 1975पासून मराठी बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या पुण्यातील प्रादेशिक वृत्त युनिटमध्ये आतापर्यंत एक वृत्त उपसंचालक आणि एक वृत्तसंपादक याशिवाय आठ पत्रकार कंत्राटी पद्धतीने काम करत होते.

इतर ठिकाणांहून प्रसारित होणार बुलेटिन

वृत्त संपादक आणि वृत्त उपसंचालक हे दैनंदिन बातम्यांच्या निर्मितीसाठी जबाबदार असतात. आकाशवाणी पुणेचे दिवसाचे पहिले प्रसारण सकाळी 7.10 वाजता होते. या विभागातील बातम्या प्रामुख्याने महाराष्ट्रात काय घडत आहे तसेच देशाच्या इतर भागांमध्ये घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडींशी संबंधित असतात. 7.10 प्रसारणाव्यतिरिक्त, कोणत्याही दिवशी प्रत्येकी दोन मिनिटांचे आणखी पाच बुलेटिन आहेत. आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की 24X7 दूरचित्रवाणी बातम्या येण्यापूर्वी, आकाशवाणीच्या मराठी बातम्या हा राज्यभरातील सर्वाधिक लोकप्रिय बातम्यांचा विभाग होता. आजही, विशेषत: ग्रामीण भागात त्याचे मोठ्या प्रमाणात चाहते आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पुणे युनिट व्यतिरिक्त, राज्यात आणखी तीन RNU युनिट्स आहेत. एक मुंबईत, एक नागपूरमध्ये आणि एक औरंगाबाद जेथून आता पुढे मराठी बातम्या प्रसारित होण्याची शक्यता आहे.

शिवसेना, काँग्रेसकडून विरोध

टीममधील दोन प्रमुख सदस्यांना हलवण्यात आल्याने त्यांना बातम्या तयार करण्यात अडचणी येणार आहेत. तर पुण्यातील मराठी वृत्त विभाग बंद करण्याच्या प्रयत्नाला शिवसेनेने कडाडून विरोध केला. सेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे म्हणाल्या, की आम्ही हा मुद्दा राज्यसभेत तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडेही मांडू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असून त्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे गोर्‍हे यांनी सांगितले. दरम्यान, पुणे काँग्रेस युनिटने आकाशवाणी पुणे यांना निवेदन दिले आणि मंत्रालयाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी केली. हा निर्णय सरकारने मागे न घेतल्यास आम्ही आंदोलन करू, असे पुणे काँग्रेसचे प्रमुख रमेश बागवे यांनी सांगितले.

आणखी वाचा :

Bhor Ram Navmi : पंतसचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत रामजन्म सोहळा साजरा; पाहा Video

Pune : भावना दुखावण्याचं कारण पुढे करत पोलिसांनी रद्द केला पुण्यात होणारा नास्तिक मेळावा

Pune local : पुणे ते लोणावळा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; धावणार तीन अतिरिक्त लोकल, वाचा सविस्तर

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.