AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींनी कणखरपणा दाखवला नसता तर आपण 60 देशांना लस पुरवली नसती : चंद्रकांत पाटील

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर कणखरपणा दाखवला नसता तर आपण जगातल्या 60 देशांना लस पुरवली नसती, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं आहे. जगातल्या 60 देशांना आपण लस पुरवली, याला कारणीभूत मोदींचं कणखर नेतृत्व आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मोदींनी कणखरपणा दाखवला नसता तर आपण 60 देशांना लस पुरवली नसती : चंद्रकांत पाटील
CHANDRAKANT PATIL
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Nov 06, 2021 | 10:39 AM
Share

पुणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर कणखरपणा दाखवला नसता तर आपण जगातल्या 60 देशांना लस पुरवली नसती, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं आहे. जगातल्या 60 देशांना आपण लस पुरवली, याला कारणीभूत मोदींचं कणखर नेतृत्व आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुण्यात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या वतीनं स्वच्छता कर्मचारी तसेच वृत्तपत्र वितारकांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात केलेल्या कामाची पावती म्हणून दिवाळी निमित्त हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना फराळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी केलेल्या भाषणात चंद्रकांत पाटील म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी कणखरपणा दाखवला नसता तर आपला देश 60 देशांना लस पुरवू शकला नसता. कधीकाळी बाहेरच्या देशातून आपल्याला लाल गहू आणावा लागला होता, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.

नवाब मलिक यांच्यावर टीका

नवाब मलिकांनी या एजन्सीच्या कामकाजात पडू नये. वानखेडेंकडून तपास काढला का नाही यात त्यांनी का पडावं. एजन्सीचं काम एजन्सीला करु द्यावं, असा टोला चंद्रकांतदादांनी मलिकांना लगावला. आर्यन खान प्रकरणी बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले, “या सगळ्याची सुरुवात नवाब मलिकांनी केली. फार काळ आम्ही शांत बसलो तर आम्हालाही हे मान्य आहे असा त्याचा अर्थ निघतो, म्हणून आम्ही बोललो”

नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असावा बहुतेक कारण सत्तेत अशताना ट्विटच्या माध्यमातून ते विविध प्रकारच्या मागण्या करु लागलेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्य सरकारची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं

पेट्रोल डिझेल दर कपातीवर बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. नाचता येईना अंगण वाकडे, अशी राज्य सरकारची स्थिती आहे. १४ राज्यांनी दर कमी केलेत.आता तुम्हीही कमी करा. प्रत्येक वेळी केंद्रावर का ढकलता?, असा सवाल चंद्रकांतदादांनी केला.

(If Modi had not shown toughness, we would not have vaccinated 60 countries Says Chandrakant patil)

हे ही वाचा :

नवाब मलिकांकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती, भंगारवाला करोडपती कसा झाला?; मोहित भारतीय यांचा सवाल

Video: पालघरच्या डहाणूमध्ये हिट अँड रन, पोलिसाच्या गाडीनं दुाचाकीस्वाराला उडवलं, तीन चाकांवर गाडी चालवण्याचा थरार, गुन्हा दाखल

T20 World Cup: स्कॉटलंडवर मोठा विजय तर मिळवला, पण भारताचं सेमीफायनलमध्ये पोहचणं अजूनही अवघड, असं आहे गणित

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.