AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

pimpri chinchawad crime | पिंपरीत सतत पोलीस चौकशीला कंटाळून मजुराने केली आत्महत्या

बासाहेब काटे यांचेसह सुमारे 20  जणांची लोणी काळभोर, लोणीकंद पोलीसांसह क्राईम ब्रँच युनिट 6 च्या पथकाने सलग तीन दिवस चौकशी केली होती. मात्र या चौकशीला कंटाळून काटे यांनी आत्महत्या केली.

pimpri chinchawad crime | पिंपरीत सतत पोलीस चौकशीला कंटाळून मजुराने केली आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Feb 09, 2022 | 5:59 PM
Share

पिंपरी – शहरातील सांडस येथे काही दिवसांपूर्वी संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड (वय 45,हवेली ) या व्यक्तीचा हत्या( murder )  झाल्याची घटना घडली होती. हत्या झालेली व्यक्ती मासेमारीचा व्यवसाय करत होती. या घटनेनंतर पोलिसांनी बाबासाहेब बबन काटे (वय-32, रा. भवरापूर, ता. हवेली) या व्यक्तीची पोलिसांनी गायकवाड यांच्या हत्येप्रकरणी चौकशी केली. पोलिसांनी सलग तीन दिवस झालेलया चौकशी मुळे नैराश्यात गेलेल्या बाबासाहेब काटे याने विष(poisonपिऊन आत्महत्या (Suicide)केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांकडून झालेल्या चौकशीमुळे खुनाचा आरोप आपल्यावर येईल अशी भीती वाटल्याने आत्महत्या केल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं

काही दिवसांपूर्वी संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड हे बहिणीकडे जातो असे सांगून घराच्या बाहेर पडले. त्यानंतर चार दिवसांनी त्याचे त्यांचा मृतदेह शरीराचे धड व हात – पाय छाटलेल्याअवस्थेत अर्धवट मृतदेह मिळून आला होता.त्यानंतर आणखी दोन दिवसांनी उरलेला मृतदेह आढळून आला. या हत्येच्या घटनेने स परिसरात खळबळ निर्माण झाली. त्यानंतर याप्रकरणी बाबासाहेब काटे यांचेसह सुमारे 20  जणांची लोणी काळभोर, लोणीकंद पोलीसांसह क्राईम ब्रँच युनिट 6 च्या पथकाने सलग तीन दिवस चौकशी केली होती. मात्र या चौकशीला कंटाळून काटे यांनी आत्महत्या केली. काटेने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्यांनी पोलिसांच्या चौकशीत बरे वाईट होईल या भीतीने आपण आत्महत्या करत असल्याचे लिहले आहे.

पोलिस चौकशी जावे लागत असल्याने माझ्या कामाच्या ठिकाणी खाडे होत आहेत. माझ्याकडे पैसे नाहीत व मी मेल्यानंतर माझ्या मुलीचे व बायकोचे कसे होणार? माझ्यावर कोणताही दबाव नाही. घरच्यांना कोणीही त्रास देऊ नका. मला जेवढी माहिती होती तेवढी मी पोलिसांना दिली आहे. मला मरायचे नव्हते पण माझे नाव आले त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मी जेवलो नाही किंवा मला झोपही लागली नाही. मला माझ्या मुलीला शिकवायचे होते. परंतु मला खूप टेंशन आल्यामुळे मी औषध घेत आहे. पोलिसांना जबाबदार ठरवत नसल्याचेही चिट्ठीत नमूद करण्यात आले आहे.

चक्क सरकारच्या नावाने लॉटरीचं आमिष, “सजग राहा”, सरकारकडून सावधानतेचा इशारा

IND VS WI: ‘अरे निघालात कुठे थांबा’, विराट-रोहित अंडर 19 टीमसमोर फेल

मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.