AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Bharat वादात प्रकाश आंबेडकर दोन दिवसात जाहीर करणार भूमिका

India vs Bharart | मराठा आरक्षणाच्या विषयावर सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी काही पुढाऱ्यांची नाव सुचवली. सध्या इंडिया विरुद्ध भारत वाद सुरु आहे. त्याबद्दलही प्रकाश आंबेडकर यांनी आपलं मत व्यक्त केलं.

India vs Bharat वादात प्रकाश आंबेडकर दोन दिवसात जाहीर करणार भूमिका
prakash ambedkarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 06, 2023 | 2:07 PM
Share

पुुणे : मागच्या आठवड्यात जालना येथे मराठा समाजावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा नववा दिवस आहे. आंदोलनस्थळी सलाईन लावून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मराठा आरक्षणाचा जीआर तात्काळ काढावा, अशी त्यांची मागणी आहे. पण एकदिवसात काढलेला जीआर कोर्टात टिकणार नाही, त्यासाठी कमीत कमी 30 दिवस द्या अशी सरकारची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला चार दिवसाचा फायनल अल्टिमेटम दिला आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे सरकारला लवकरच या विषयावर ठोस भूमिका घ्यावी लागेल.

“मराठा समाजाचे पुढारी एकनाथ शिंदे, शरद पवार, अशोक चव्हाण या मराठा पुढाऱ्यांनी आता स्वतः तोडगा काढावा” असं वंचित बहुजन आधाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. “सरकारने आता तोडगा नाही असं सांगितलं, तर मग यांनी पुढे आलं पाहिजे. मराठा समाजातील सर्व पुढाऱ्यांनी तोडगा मांडावा” असं प्रकाश आंबेडकर यांनी आवाह केलं. आंदोलनात काँग्रेस तेल टाकण्याचं काम करत आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. “महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणावरून जो ब्लेम गेम सुरू आहे, तो योग्य नाही” असही ते म्हणाले. आरक्षणाच्या प्रश्नावर दोघेही तितकेच जबाबदार आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

इंडिया विरुद्ध भारत, दोन दिवसात भूमिका जाहीर करणार

“इंडिया विरुद्ध भारत या वादात विरोधी पक्ष हा भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकत चालला आहे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. “संपूर्ण इंडिया आघाडी सध्या भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकली आहे. भारत आणि इंडिया हे एकमेकांच्या विरोधात नाही. मी इंडियाचा भाग आहे की, नाही येत्या दोन दिवसात पक्षाची भूमिका जाहीर करणार आहे” अस प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्यात ओबीसी, मराठा आणि मराठा वंजारी वाद लावायचं सध्या काम सुरू आहे असं ते म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.