AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : राज्यात मान्सून कमजोर, IMD ने दिला नाही कुठेही अलर्ट, केव्हापासून होणार पाऊस सक्रीय

IMD Weather forecast : राज्यात जुलै महिन्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. परंतु ऑगस्ट महिन्यात मान्सून कमकुवत राहिला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मुसळधार बरसलाच नाही.

Rain : राज्यात मान्सून कमजोर, IMD ने दिला नाही कुठेही अलर्ट, केव्हापासून होणार पाऊस सक्रीय
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 08, 2023 | 10:20 AM
Share

पुणे | 8 ऑगस्ट 2023 : राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यंदा उशीरा दाखल झालेला मान्सून जुलै महिन्यात सर्वत्र झाला. कोकण आणि विदर्भात तर अतिवृष्टी झाली. अनेक गावांना पाण्याने वेढले होते. यामुळे हाहाकार माजला होता. एनडीआरएफची टीम तैनात केली होती. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी होऊ लागला. अजून काही दिवस पावसाचा जोर कमकुवत असणार आहे. राज्यात मंगळवारी कोणत्याही जिल्ह्यास अलर्ट दिला गेला नाही.

पावसाचा ब्रेक शेतकरी चिंतेत

राज्यात पावसाने ब्रेक घेतल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. यंदा हवामान विभागाने एल निनोचा प्रभाव असल्याचे म्हटले होते. यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज स्कायमेटकडून व्यक्त केला गेला होता. परंतु भारतीय हवामान विभागाने सरासरी इतका पाऊस असणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे दुष्काळाचे संकेत तर नाहीत ना? अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी राज्यात 10 ऑगस्टपर्यंत कुठेच मुसळधार पाऊस नसल्याचे म्हटले आहे.

कधी पडणार पाऊस

हवामान विभागाच्या माहितीनुसार तीन दिवसानंतर हिमालयाच्या पायथ्याशी पाऊस सुरु होणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. तीन दिवसानंतर कोकणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. राज्यात 15 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने तेरा हजार पाचशे हेक्टरवर इंद्रायणी भाताच्या शेतीची लागवडी करण्यात आली आहे. यंदा जवळपास 92 टक्के शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली आहे.

धरणांमध्ये जलसाठा

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण आतापर्यंत ८७ टक्के भरल्याने नाशिककरांची पाण्याची चिंता दूर झालीय. परंतु नाशिकमधील पावसाचे इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदाघाट परिसरात असलेल्या दुतोंड्या मारुतीला यंदा पाण्याचा स्पर्श झालेला नाही. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत चार वेळेस महापूर गोदावरीला आला होता.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...