AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : राज्यात अजून किती दिवस पावसाची विश्रांती, हवामान विभागाकडून महत्वाची माहिती

Weather forecast : राज्यात जुलै महिन्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने अनेक ठिकाणी विश्रांती घेतली आहे. राज्यात सोमवारी कोणत्याही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला नाही.

Rain : राज्यात अजून किती दिवस पावसाची विश्रांती, हवामान विभागाकडून महत्वाची माहिती
| Updated on: Aug 07, 2023 | 8:35 AM
Share

पुणे | 7 ऑगस्ट 2023 : राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने अनेक भागांत विश्रांती घेतली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात कोकण आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी होऊ लागला. गेल्या चार, पाच दिवसांपासून पावसाने राज्यातील अनेक भागांत दडी मारली आहे. सोमवारी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यास हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला नाही. परंतु विदर्भातील काही भागात यलो अलर्ट दिला आहे. आगामी चार दिवस राज्यात पाऊस कसा असणार आहे, याचा अंदाजही हवामान विभागाने जारी केलाय.

कसा असणार पाऊस

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत १० ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज दिला आहे. राज्यात १० ऑगस्टपर्यंत कुठलेही तीव्र हवामानाचे इशारे दिले नाहीत. तसेच येत्या 4, 5 दिवस हलका ते मध्यम पाऊस असणार आहे. दरम्यान सोमवारी वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे. इतर कोणत्याही जिल्ह्यात पावसाचा अलर्ट दिला गेला नाही.

मुंबई, पुणे धरणसाठा

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा झाला आहे. परंतु पाणी कपात कायम राहणार आहे. पावासाने ओढ दिल्यास भविष्यात टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून ही काळजी घेतली जात आहे. बदलापूरचे बारवी धरण ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणाच्या ८ दरवाजांमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

भीमा नदी पात्रात विसर्ग

पुणे शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीपुरवठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचे पाणी कपातीचे संकट टळणार आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील चास कमान धरण पूर्ण भरले आहे. या धरणाच्या दोन दरवाजेद्वारे 1096 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. डाव्या कालव्यातून 500 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी सुटला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसुबाई – हरिश्चंद्रगड परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. या ठिकाणी निळवंडे धरण 82 टक्के भरले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.