AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘शाहीन बाग’च्या धर्तीवर ‘किसान बाग’ आंदोलन

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतीलच शाहीन बागच्या धर्तीवर किसान बाग आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 'शाहीन बाग'च्या धर्तीवर 'किसान बाग' आंदोलन
| Updated on: Jan 27, 2021 | 3:44 PM
Share

सोलापूर : राजधानी दिल्लीच्या सीमेवर 2 महिन्यांपासून अधिक काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतीलच शाहीन बागच्या धर्तीवर किसान बाग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी किसान बाग आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला आज राज्यभरात सुरुवात होत आहे. सोलापुरातही वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली किसान बाग आंदोलनाला सुरुवात झाली आहे.(Kisan Bagh Andolan started in Maharashtra on the lines of Shaheen Bagh in Delhi from the VBA)

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट इथं सुरु झालेल्या या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यभर किसान बाग आंदोलन करण्याची घोषणा केलीय. देशात शाईन बाग आंदोलन झालं तसंच महाष्ट्रात किसान बाग आंदोलन करण्याचा वंचितचा संकल्प आहे.

प्रकाश आंबेडकरांची हाक

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीतील शाईन बाग आंदोलनासारखं राज्यात किसान बाग आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केलाय. या आंदोलनासाठी अनेक मुस्लीम संघटनांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलाय. राज्यभर हे आंदोलन होणार असून शाईन बागच्या धर्तीवर किसान बाग असे आंदोलनाचे स्वरूप असेल. राज्यभरातील लाखो मुस्लीम बांधव या आंदोलनात उतरणार आहेत.

कसं होतं शाहीन बाग आंदोलन?

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (NRC) विरोधात दिल्लीच्या रस्त्यावर शाहीन बाग आंदोलन झालं होतं. यामुळे त्या भागातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीत गाजलेला हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला होता. दोन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेला रस्ता सुरु करण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानंही रस्ता ठप्प करणाऱ्या शाहीन बाग इथल्या आंदोलकांना झापलं होतं.

शाहीन बाग आंदोलनामुळे 13ए रोड पूर्णपणे बंद होता. हा रस्त्या दिल्ली आणि नोएडाला जोडतो. रस्ता बंद झाल्यामुळे नोएडा आणि दिल्लीतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जाव लागत होतं.

संबंधित बातम्या : 

शाईन बागच्या धर्तीवर महाराष्ट्रात किसान बाग आंदोलन होणार, वंचितची मोठी घोषणा

दिल्ली हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट: नवाब मलिक

Kisan Bagh Andolan started in Maharashtra on the lines of Shaheen Bagh in Delhi from the VBA

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.